श्रावण सोमवारी ऑपरेशन महादेव; श्रीनगरमध्ये चकमक, मुसा सुलेमानीसह ३ दहशतवादी ठार


श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर येथे सुरक्षा पथकांनी ऑपरेशन महादेव राबवले. या ऑपरेशन अंतर्गत सुरक्षा पथकांनी ३ दहशतवाद्यांना ठार केले. गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा पथकांनी कारवाई केली. श्रीनगरमधील दाचीगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवान भागात चकमक झाली. या चकमकीत ३ दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये मुसा सुलेमानी आहे. हा मुसा सुलेमानी आधी पाकिस्तानच्या सैन्यात कार्यरत होता. 





भारतीय सैन्याच्या चिनार कॉर्प्सने 'एक्स' अर्थात ट्विटरवर चकमकीची माहिती दिली आहे. तीव्र गोळीबारानंतर तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. चकमक अद्याप सुरू आहे; असे चिनार कॉर्प्सने 'एक्स' अर्थात ट्विटरवर जाहीर केले. स्थानिक पोलीस ठाण्यानेही चकमकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दोन वेळा गोळीबाराचा आवाज ऐकू आला. त्यानंतर अधिक कुमक पाठवण्यात आली. दहशतवाद्यांना मारण्यासाठी शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली; असे पोलिसांनी सांगितले.


Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या