राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले? वाचा...

"काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्राच्या मनात आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही.": देवेंद्र फडणवीस


मुंबई: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६५ वा वाढदिवस साजरा झाला. यादरम्यान उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे अनेक वर्षानंतर मातोश्रीची पायरी चढले.  ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरु असताना उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेणे, हे युतीचे संकेत असल्याचे बोलले जात आहे. ज्यावर अनेक राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. मात्र आता, या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर प्रश्न विचारला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘उद्धवजींचा जन्मदिवस आहे, त्यांना शुभेच्छा द्यायला राज ठाकरे गेले होते ही आनंदाची गोष्ट आहे. आमच्याही शुभेच्छा उद्धव ठाकरेंना आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेल्यावर त्यात राजकारण पाहणं योग्य नाही.’


दोन्ही पक्षांच्या युतीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मनातलं घडेल असं म्हटलं होतं. याबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘राज्याच्या मनात काय आहे ते आपल्याला विधानसभा निवडणूकीत दिसलं आहे. आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतही दिसेल. आता काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्राच्या मनात आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही.’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

संपलेल्या पक्षासोबत युती, तब्बल ८० जागा टाकणार झोळीत

उबाठा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उबाठा आणि मनसेची युती

खासदार, आमदार, माजी आमदारांची आपल्या नातेवाईकांसाठी तिकीटाकरता फिल्डींग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंची युतीची झालेली असून

माजी खासदार राहुल शेवाळेंची वहिनी थेट धारावीतून लढणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे या

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक जाहीर

पुणे : मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी १५ मे रोजी मतदान आणि १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या

उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी केलेले एक काम संजय राऊतांनी दाखवावे

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे थेट आव्हान उद्धव ठाकरे आणि उबाटा गट यांनी मराठी माणसाच्या हितासाठी काय

१६ जानेवारीला आपण अटलजींना खरी आदरांजली द्यायची आहे" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : आज संपूर्ण देशभरात अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्त भाजपा