राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले? वाचा...

"काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्राच्या मनात आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही.": देवेंद्र फडणवीस


मुंबई: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६५ वा वाढदिवस साजरा झाला. यादरम्यान उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे अनेक वर्षानंतर मातोश्रीची पायरी चढले.  ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरु असताना उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेणे, हे युतीचे संकेत असल्याचे बोलले जात आहे. ज्यावर अनेक राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. मात्र आता, या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर प्रश्न विचारला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘उद्धवजींचा जन्मदिवस आहे, त्यांना शुभेच्छा द्यायला राज ठाकरे गेले होते ही आनंदाची गोष्ट आहे. आमच्याही शुभेच्छा उद्धव ठाकरेंना आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेल्यावर त्यात राजकारण पाहणं योग्य नाही.’


दोन्ही पक्षांच्या युतीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मनातलं घडेल असं म्हटलं होतं. याबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘राज्याच्या मनात काय आहे ते आपल्याला विधानसभा निवडणूकीत दिसलं आहे. आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतही दिसेल. आता काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्राच्या मनात आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही.’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीबाबत आला 'सर्वोच्च' निर्णय

मुंबई : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती सर्वोच्च

सर्वसामान्यांसाठी सुरू केलेली एकही योजना बंद होणार नाही

राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकरी, महिला आणि युवकांचा बार्शी येथील सभेत आमदार दिलीप सोपल यांच्यावर

राहुल गांधींची वक्तव्ये देशहिताला धक्का पोहोचवणारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल; लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव देण्याबाबत चर्चेतून निर्णय

राऊत हे उबाठाचे प्रवक्ते आहेत की पवार, काँग्रेस आणि डाव्या आघाडीचे ?

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा परखड सवाल मुंबई : संजय राऊत हे अधिकृतपणे उबाठा गटाचे प्रवक्ते म्हणून

कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष निवडू

सुनील तटकरे; २०१९ मध्ये भाजपसोबत जाण्याची अजित पवारांची इच्छा का झुगारली? मुंबई : "राष्ट्रवादी काँग्रेसवर