दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशात महाराष्ट्र पाचव्या स्थानी

  71

‘सबका साथ, सबका विकास’मुळे प्रगती


नवी दिल्ली :चालू आर्थिक वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न १,१४,७१० रुपये झाले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत यासंबंधी माहिती दिली. २०१४-१५ मध्ये स्थिर किमतींवर दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न ७२,८०५ रुपये होते. गेल्या दशकात ४१,९०५ रुपयांनी वाढ झाली आहे.


राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आपल्या उत्तरात म्हटले की, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या जीडीपीच्या तात्पुरत्या अंदाजानुसार, २०२४-२५ साठी स्थिर किमतींवर दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न १,१४,७१० रुपये आहे. दहा वर्षांपूर्वी हेच प्रमाण ७२,८०५ रुपये एवढे होते.
भारताच्या अनेक राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही दरडोई उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.



कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणाची प्रगती


२०१३-१४ साली महाराष्ट्र सर्वाधिक दरडोई उत्पन्नाच्या यादीत हरियाणानंतर दुसऱ्या स्थानावर होता. त्यावेळी महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न १,०९,५९७ इतके होते. दुसऱ्या वर्षी त्यात वाढ होऊन दरडोई उत्पन्न १,१५,०५८ रुपयांवर पोहोचले होते. २०१४-१५ साली कर्नाटकचे दरडोई उत्पन्न १,०५,६९७ रुपये, तामिळनाडूचे १,०७,११७ रुपये व तेलंगणाचे १,०१,४२४ रुपये इतके उत्पन्न होते. महाराष्ट्राच्या मागे असलेली ही तीनही राज्य आता पुढे गेली आहेत. महाराष्ट्राची मात्र म्हणावी तशी आर्थिक प्रगती झालेली दिसत नाही.



देशातील दरडोई उत्पन्नात राज्यांची क्रमवारी


कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पुदुच्चेरी, आंध्र प्रदेश, पंजाब, ओडिशा, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, आसाम, मेघालय, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, झारखंड, केरळ, मणिपूर, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, चंदिगड, दिल्ली, लडाख.

Comments
Add Comment

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये