Asia Cup 2025: 'या' दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान सामना, स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर

Asia Cup 2025: आशिया कप २०२५च्या तारखा समोर आल्या आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी तारखांबाबत माहिती दिली आहे. अनेक वाद आणि चर्चांनंतर भारत आणि पाकिस्तान लवकरच क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील हा सामना २०२५ च्या आशिया कपमध्ये होणार आहे, ज्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.


आशिया कप २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये खेळवली जाईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा टी२० स्वरूपात खेळवली जाईल, जी आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ च्या तयारीचा भाग म्हणून निश्चित करण्यात आली आहे.



भारत-पाकिस्तान एकाच गटात


४ संघांना वेगवेगळ्या गटात स्थान देण्यात आले आहे. भारत-पाकिस्तान एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान हे संघ आहेत. गट ब मध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे संघ आहेत.



भारताचा पहिला सामना या संघासोबत


आशिया कप २०२५ ही स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरू होईल. पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होईल. भारताचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध असेल. भारताचा दुसरा सामना १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध आहे. तर तिसरा सामना १९ सप्टेंबर रोजी ओमान विरुद्ध असेल.



८ संघ सहभागी


आशिया कपच्या आगामी आवृत्तीत आठ संघ सहभागी होतील. त्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे. स्पर्धेत आठ संघांना प्रत्येकी चार अशा दोन गटात विभागण्यात आले आहे. गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि हाँगकाँग आहेत. अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि ओमान यांना गट ब मध्ये स्थान मिळाले आहे.



राजकीय तणावामुळे भारत-बांगलादेश मालिका पुढे ढकलण्यात आली


अलीकडेच, भारत आणि बांगलादेशमधील राजनैतिक तणावाचे कारण देत बीसीसीआयने ढाका येथे झालेल्या एसीसी बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी बैठकीत व्हर्च्युअल पद्धतीने भाग घेतला. या तणावामुळे, ऑगस्ट २०२५ मध्ये प्रस्तावित भारत-बांगलादेश द्विपक्षीय मालिका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Smruti Mandhana : स्मृती मानधना टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय क्रिकेटपटू

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिकी महिला संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला

IPL 2026 : गुजरातचा कोलकातावर पाच गडी राखून विजय

अहमदाबाद : गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पाच गडी राखून पराभव केला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी

Mumbai Cricket Team : मुंबई क्रिकेट संघाचा ऐतिहासिक निर्णय; मुंबईचे खेळाडू होणार मालामाल, मिळणार लाखोंचा पगार

मुंबई :  मुंबईतून अधिकाधिक हिरे भारतीय क्रिकेट संघाला मिळावेत यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने हे महत्वपूर्ण पाऊल

IPL 2026 MI vs PBKS : "काही कठीण निर्णय घेण्याची गरज आली आहे - हार्दिक पांड्या" ; मुंबईच्या अंतर्गत वादाचा खेळावर परिणाम?

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी सुरूच आहे. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला सात गडी राखून

IPL : मुंबई इंडियन्सचा सलग चौथा पराभव, पंजाबचा विजय, किंग्स झाले IPL टॉपर

मुंबई : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील अपराजित मालिका कायम राखली. गुरुवारी मुंबईच्या वानखेडे

Pat Cummins, IPL 2026 : पॅट कमिन्स आयपीएलमध्ये पुनरागमनासाठी सज्ज; गोलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त

मुंबई : सिडनीमध्ये नुकत्याच झालेल्या स्कॅननंतर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला कोणत्याही