मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीत आणखी ६ महिने वाढ

इम्फाळ : गेल्या काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला होता. त्यामुळे मणिपूरमध्ये केंद्र सरकारकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. आता या राष्ट्रपती राजवटीचा कालावधी पुन्हा एकदा सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे. आता हा कालावधी १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत लागू असणार आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट वाढवण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. राज्यात शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत हा प्रस्ताव मांडला, ज्याला संसदेने मंजुरी दिली. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता राष्ट्रपती राजवटीचा कालावधी पुन्हा एकदा सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

Crime News : पाटण्यात माणुसकीला काळीमा; सख्ख्या काकाकडूनच ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार

Ladakh: लिलावात २५ हजार रुपयांना विकले गेले १० रुपये किमतीचे अंडे; इराणी पीडितांसाठीचा अनोखा उपक्रम चर्चेत

नवी दिल्ली: लडाखमधील लेह जिल्ह्यातील लोक इराणच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. युद्धाच्या काळात

Delhi: पार्किंगवरून महिला उपनिरीक्षक आणि वृद्ध व्यक्तीमध्ये वाद, पोलिसांनी काय कारवाई केली?

दिल्ली: दिल्लीतील उत्तर रोहिणी परिसरात पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या