मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीत आणखी ६ महिने वाढ

इम्फाळ : गेल्या काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला होता. त्यामुळे मणिपूरमध्ये केंद्र सरकारकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. आता या राष्ट्रपती राजवटीचा कालावधी पुन्हा एकदा सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे. आता हा कालावधी १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत लागू असणार आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट वाढवण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. राज्यात शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत हा प्रस्ताव मांडला, ज्याला संसदेने मंजुरी दिली. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता राष्ट्रपती राजवटीचा कालावधी पुन्हा एकदा सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या