मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीत आणखी ६ महिने वाढ

इम्फाळ : गेल्या काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला होता. त्यामुळे मणिपूरमध्ये केंद्र सरकारकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. आता या राष्ट्रपती राजवटीचा कालावधी पुन्हा एकदा सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे. आता हा कालावधी १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत लागू असणार आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट वाढवण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. राज्यात शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत हा प्रस्ताव मांडला, ज्याला संसदेने मंजुरी दिली. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता राष्ट्रपती राजवटीचा कालावधी पुन्हा एकदा सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर