जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर सवाल, मँचेस्टर कसोटीत गोलंदाजीमध्ये धार नाही

मँचेस्टर: इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहवर सगळ्यांच्या नजरा आहेत. दरम्यान, बुमराहची कामगिरी अद्याप चमकदार दिसलेली नाही. बुमराहने इंग्लंडच्या पहिल्या डावात २३ षटके टाकली. त्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. तसेच ७९ धावाही खर्च केल्या. बुमराहला २४व्या षटकांत विकेट मिळाली. त्याने जेमी स्मिथला बाद केले.


जसप्रीत बुमराह मँचेस्टर कसोटी सामन्यादरम्यान थकलेला दिसत होता. बुमराहची लेंथ लाईन योग्य नव्हती. त्याने काही बॉल साईडला टाकले. तर काही बॉल जर गरजेपेक्षा शॉर्ट ठेवले. बुमराह साधारणपणे १३८-१४२च्या वेगाने गोलंदाजी करतो. मात्र या सामन्यात त्याने एकही बॉल १४०च्या वर स्पीडने फेकली नाही. अशातच बुमराहच्या फिटनेसवर सवाल उपस्थित केले जात आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननेही म्हटले की बुमराहच्या गोलंदाजीमध्ये ती धार दिसत नाही जी लॉर्ड्स कसोटीत दिसत होती.


जेव्हा इंग्लंडच्या पहिल्या डावात भारताचा कर्णधार शुभमन गिलने दुसरा नवा बॉल आणला तेव्हा जसप्रीत बुमराहने केवळ एक षटक टाकले आणि तो मैदानाबाहेर गेला. दरम्यान, थोड्या वेळाने तो मैदानात परतला मात्र या घटनेने स्पष्ट संकेत दिले की सामन्यात त्याचे शरीर पूर्णपणे साथ देत नाही.


जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीदरम्यान जसप्रीत बुमराहला पाठीला दुखापत झाली होती. पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर बुमराह इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळला. तो एक छोटा फॉरमॅट होता. यात गोलंदाजाला अधिकाधिक ४ षटके टाकता येत. कसोटी क्रिकेटमधील मोठ्या स्पेल्ससाठी बुमराहचे शरीर तयार नव्हते. यामुळेच निर्णय घेण्यात आला की तो सध्याच्या कसोटी मालिकेत केवळ ३ सामने खेळणार आहे. हेड कोच गौतम गंभीरनेही हे कन्फर्म केले होते.


Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण