'या' कारणांसाठी घेता येणार वर्षातून महिनाभराची सुट्टी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्यसभेत मोठा निर्णय

नवी दिल्ली: मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी वर्षभरातून ३० दिवसांची रजा देण्याचा निर्णय घेतला आहे.


त्यामुळे तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल, आणि तुमच्या वृद्ध पालकांच्या आरोग्याची काळजी वाटत असेल, तसेच तुम्हाला कामाच्या व्यापामुळे त्यांना वेळ देता येत नसेल, तर आता तुमची चिंता मिटली आहे.  कारण आता केंद्र सरकारी कर्मचारी त्यांच्या पालकांची काळजी घेण्यासाठी ३० दिवसांची रजा घेऊ शकतात. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत या निर्णयाची माहिती दिली.



डॉ. जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले?


केंद्र सरकारचे कर्मचारी ३० दिवसांची अर्जित रजा घेऊ शकतात. ज्यामध्ये ते त्यांच्या पालकांची काळजी घेऊ शकतात तसेच त्यांची इतर अनेक वैयक्तिक कामे पूर्ण करू शकतात.

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, केंद्रीय नागरी सेवा नियम १९७२  अंतर्गत, कर्मचाऱ्याला दरवर्षी ३०  दिवसांची अर्जित रजा दिली जाईल. याशिवाय, कर्मचाऱ्याला २० दिवसांची अर्धवेतन रजा, ८ दिवसांची प्रासंगिक रजा आणि २ दिवसांची मर्यादित रजा मिळते.


कर्मचारी वैयक्तिक कारणांसाठी या सर्व रजा घेतो. डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. या सर्व रजा वृद्ध पालकांच्या काळजीसह वैयक्तिक कारणांसाठी घेता येतात. केंद्रीय सरकारी कर्मचारी, ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोघेही समाविष्ट आहेत, त्यांच्या पालकांची काळजी घेण्यासाठी रजा घेऊ शकतात.

Comments
Add Comment

Uttar Pradesh: मेड असल्याचे सांगत महिलेने केले घर साफ; स्त्रीला बेशुद्ध करून...

उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडातील एका सोसायटीत वृद्ध महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्या घरात चोरी करण्यात आली.

Iranian crude oil : इराणी कच्च्या तेलाचा कार्गो चीनकडे वळवला गेल्याच्या बातम्या तथ्यात्मकदृष्ट्या चुकीच्या, सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इराणी कच्च्या तेलाचा एक कार्गो पेमेंटशी संबंधित अडचणींमुळे गुजरातमधील वाडीनार

Green Sanvi Vessel: ग्रीन सान्वी जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आणत असलेला एलपीजी गॅस किती दिवस पुरेल?

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील पुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

बाजारात बनावट आंब्यांचा सुळसुळाट; तब्बल २०० किलो बनावट आंबे जप्त

हैद्राबाद : उन्हाळा सुरु झाला की स्वागत केलं जात ते फळांचा राजा आंब्याचं, कारण वर्षभरातून फक्त उन्हळ्यातच

Air India Airlines : एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची पश्चिम आशियातून ४२ विमानसेवा सुरु होणार

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर, टाटाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या पश्चिम

Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल)