'या' कारणांसाठी घेता येणार वर्षातून महिनाभराची सुट्टी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्यसभेत मोठा निर्णय

नवी दिल्ली: मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी वर्षभरातून ३० दिवसांची रजा देण्याचा निर्णय घेतला आहे.


त्यामुळे तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल, आणि तुमच्या वृद्ध पालकांच्या आरोग्याची काळजी वाटत असेल, तसेच तुम्हाला कामाच्या व्यापामुळे त्यांना वेळ देता येत नसेल, तर आता तुमची चिंता मिटली आहे.  कारण आता केंद्र सरकारी कर्मचारी त्यांच्या पालकांची काळजी घेण्यासाठी ३० दिवसांची रजा घेऊ शकतात. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत या निर्णयाची माहिती दिली.



डॉ. जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले?


केंद्र सरकारचे कर्मचारी ३० दिवसांची अर्जित रजा घेऊ शकतात. ज्यामध्ये ते त्यांच्या पालकांची काळजी घेऊ शकतात तसेच त्यांची इतर अनेक वैयक्तिक कामे पूर्ण करू शकतात.

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, केंद्रीय नागरी सेवा नियम १९७२  अंतर्गत, कर्मचाऱ्याला दरवर्षी ३०  दिवसांची अर्जित रजा दिली जाईल. याशिवाय, कर्मचाऱ्याला २० दिवसांची अर्धवेतन रजा, ८ दिवसांची प्रासंगिक रजा आणि २ दिवसांची मर्यादित रजा मिळते.


कर्मचारी वैयक्तिक कारणांसाठी या सर्व रजा घेतो. डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. या सर्व रजा वृद्ध पालकांच्या काळजीसह वैयक्तिक कारणांसाठी घेता येतात. केंद्रीय सरकारी कर्मचारी, ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोघेही समाविष्ट आहेत, त्यांच्या पालकांची काळजी घेण्यासाठी रजा घेऊ शकतात.

Comments
Add Comment

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या

१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने

नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?

नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २०

रेड कॉरिडॉर आता ग्रोथ कॉरिडॉर बनला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पोलिस स्मृतीदिनानिमित्त वक्तव्य

नवी दिल्ली: पोलीस स्मृतीदिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील पोलीस आणि सुरक्षा दलांच्या

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये जोरदार पाऊस आणि वादळामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी

जगभरातील वेबसाइट्स आणि अ‍ॅप्स ठप्प: AWSमध्ये बिघाड, युजर्सना मोठा फटका

नवी दिल्ली : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जगभरातील लाखो इंटरनेट युजर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.