पुण्यात कोयता गँगची दहशत, भवानी पेठेत धुमाकूळ

पुणे : गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे . कोयता गँगची दहशत हा एक चर्चेचा विषय झाला आहे . कोयता गँगचे गुंड अनेकदा कुठल्यातरी वादावरून हातात कोयते घेऊन नागरी वस्तीत रात्री अपरात्री दहशत निर्माण करतात . स्थानिकांना त्रास देतात , वाहनांची तोडफोड करतात . पुण्यातील भवानी पेठ येथे पुन्हा एकदा किरकोळ कारणावरून कोयते उपसत तरुणांनी दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे. आम्हीच इथले भाई म्हणत तरुणांच्या जमावाने १०-१२ गाड्या फोडल्याचा प्रकार समोर आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .


पुण्यातील भवानी पेठ परिसरात कोयत्याने दहशत माजवणाऱ्या टोळक्याने किरकोळ कारणावरून हातात कोयते आणि तलवारी घेत परिसरात हिंसाचार घडवून आणला. या तरुणांनी रस्त्यावर उतरून १० ते १२ दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली. घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये या तरुणांनी 'आम्हीच इथले भाई, आमच्या नादी कोणी लागू नये' असा इशारा देखील दिला. त्यांच्या या दहशतीमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला होता. मात्र या वादाला हिंसक वळण लागले . मध्यरात्रीच्या सुमारास या तरुणांनी नागरी वस्तीत जमाव करून हातात कोयते घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर हल्ला चढवत तोडफोड केली. लोकांना घाबरवले . घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकारामुळे भवानी पेठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी