माणिकराव कोकाटे यांचे कृषीमंत्रीपद जाणार, कोण होणार नवे कृषीमंत्री?

मुंबई: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे विधानसभेतील रमी प्रकरण राजकारणात चांगलेच तापले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी दिवसागणिक जोर धरू लागली आहे. मात्र, मी काही चुकीचे केलेच नाही असे म्हणत कोकाटे यांनी कृषिमंत्री पदाचा राजीनामा देणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, आता कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याऐवजी मकरंद पाटील यांना कृषी खातं सोपवण्यात येऊ शकतं असा अंदाज आहे.


रमी प्रकरणाविषयी कोकाटे यांनी आपली बाजू स्पष्ट जरी केली असली तरी, त्यांच्या काही वक्तव्यामुळे पक्षाने त्यांच्याविषयी नाराजी देखील व्यक्त केली आहे. त्यामुळेच त्यांचे मंत्रीपद ताबडतोब रद्द केले जाणार नाही, मात्र त्यांना कृषी खात्याच्या जबाबदारीतून हटवले जाणार असल्याचे म्हंटले जात आहे. त्याऐवजी त्यांना सध्या मकरंद पाटील यांच्याकडे असलेले मदत आणि पुनर्वसन खातं सोपवले जाईल, असा अंदाज आहे.


विधानपरिषदेत रमी खेळणे,शेतकऱ्यांसंदर्भात वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणे यामुळे माणिकराव कोकाटेंविषयी नाराजी वाढत चालली आहे. तसेच त्यांची वक्तव्य सरकारला अडचणीत टाकणारी ठरत आहेत. पण म्हणून त्यांना मंत्रीपदावरून तात्काळ काढणे योग्य ठरणार नसल्यामुळे, फक्त त्यांच्या खात्यात बदल केले जाणार असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मत आहे.



मकरंद पाटील यांच्या खांद्यावर सोपवणार कृषीमंत्री पदाची धुरा ?


गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य तसेच सभागृहात रमी खेळत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने महायुतीतील मंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे. तसेच राज्यभरात विविध ठिकाणी कोकाटे यांच्याविरोधात रस्त्यावरती अनेक आंदोलनंही झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा एकंदरच खूप अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली असतानाच आता कोकाटे यांचं मंत्रीपदाचं खात बदलणार असल्याची माहिती समोर येत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच दुसरे मंत्री असलेले मकरंद आबा पाटील यांच्याकडे असलेलं मदत व पुनर्वसन खातं हे कोकाटे यांना मिळू शकतं. तर कृषीमंत्रीपदाची धुरा ही मकरंद पाटील यांच्या खांद्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. तसेच हा प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये; मंत्री छगन भुजबळ यांचे ओबीसी बांधवांना आवाहन

ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या कुटुंबियांचे भुजबळांनी केले सांत्वन, म्हणाले... लातूर: मनोज

रेशनच्या तांदळात आढळला मृत साप

सोलापूर : सोलापूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मागील दोन

कॉरिडॉरसाठी आमची घरं-दारं पाडण्यापेक्षा विठ्ठल मंदिराचा काही भाग पाडा

दुकानदाराच्या विचित्र वक्तव्याने भाविक संतप्त सोलापूर : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुरातील

Police Bharti 2025: पोलिस भरतीत तरुणांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र सरकारची वयोमर्यादेत विशेष सूट

मुंबई: महाराष्ट्रातील असे अनेक तरुण आहेत, जे पोलिस अधिकारी किंवा कॉन्स्टेबल बनण्याचे स्वप्न उरी बाळगून आहेत, आणि

Ahmednagar Railway Station : सरकारचा मोठा निर्णय! अहिल्यानगर रेल्वे स्थानक’ नावाला मंजुरी, स्थानिकांच्या मागणीला अखेर यश

अहिल्यानगर : महाराष्ट्रात नामांतराच्या प्रक्रियेला वेग आला आहे. अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्याचे नाव बदलून

Beed Crime : फक्त एका चुकीनं घेतला जीव! नर्तकीच्या प्रेमात अडकलेल्या माजी उपसरपंचाने संपवलं जीवन, काय घडलं त्या दोन रात्री?

बीड : माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या आत्महत्येनंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक