माणिकराव कोकाटे यांचे कृषीमंत्रीपद जाणार, कोण होणार नवे कृषीमंत्री?

मुंबई: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे विधानसभेतील रमी प्रकरण राजकारणात चांगलेच तापले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी दिवसागणिक जोर धरू लागली आहे. मात्र, मी काही चुकीचे केलेच नाही असे म्हणत कोकाटे यांनी कृषिमंत्री पदाचा राजीनामा देणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, आता कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याऐवजी मकरंद पाटील यांना कृषी खातं सोपवण्यात येऊ शकतं असा अंदाज आहे.


रमी प्रकरणाविषयी कोकाटे यांनी आपली बाजू स्पष्ट जरी केली असली तरी, त्यांच्या काही वक्तव्यामुळे पक्षाने त्यांच्याविषयी नाराजी देखील व्यक्त केली आहे. त्यामुळेच त्यांचे मंत्रीपद ताबडतोब रद्द केले जाणार नाही, मात्र त्यांना कृषी खात्याच्या जबाबदारीतून हटवले जाणार असल्याचे म्हंटले जात आहे. त्याऐवजी त्यांना सध्या मकरंद पाटील यांच्याकडे असलेले मदत आणि पुनर्वसन खातं सोपवले जाईल, असा अंदाज आहे.


विधानपरिषदेत रमी खेळणे,शेतकऱ्यांसंदर्भात वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणे यामुळे माणिकराव कोकाटेंविषयी नाराजी वाढत चालली आहे. तसेच त्यांची वक्तव्य सरकारला अडचणीत टाकणारी ठरत आहेत. पण म्हणून त्यांना मंत्रीपदावरून तात्काळ काढणे योग्य ठरणार नसल्यामुळे, फक्त त्यांच्या खात्यात बदल केले जाणार असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मत आहे.



मकरंद पाटील यांच्या खांद्यावर सोपवणार कृषीमंत्री पदाची धुरा ?


गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य तसेच सभागृहात रमी खेळत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने महायुतीतील मंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे. तसेच राज्यभरात विविध ठिकाणी कोकाटे यांच्याविरोधात रस्त्यावरती अनेक आंदोलनंही झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा एकंदरच खूप अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली असतानाच आता कोकाटे यांचं मंत्रीपदाचं खात बदलणार असल्याची माहिती समोर येत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच दुसरे मंत्री असलेले मकरंद आबा पाटील यांच्याकडे असलेलं मदत व पुनर्वसन खातं हे कोकाटे यांना मिळू शकतं. तर कृषीमंत्रीपदाची धुरा ही मकरंद पाटील यांच्या खांद्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. तसेच हा प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आता दहा पदरी! 'एमएसआरडीसी' लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणात सरासरी ११.१ टक्के वाढ

ठाणे : नागरिकांनी याही वर्षी दिवाळी सण उत्साहाने साजरा केला असून याकाळात फटाके वाजण्याच्या प्रमाणातही वाढ

‘संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख’

नागपूर : सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी नागपूर येथे विस्तार करीत आहे. या

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींची नाराजी दूर, ७० लाख महिलांच्या अपात्रतेची भीती टळली; e-KYCच्या ‘त्या’ निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती

मुंबई : राज्यातील महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पुन्हा एकदा

लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’ला ब्रेक; ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता

मुख्यमंत्री शनिवारी जाणार नाशिक दौऱ्यावर

नाशिक : अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ३८ वे अधिवेशन शनिवार, दि. २५ ते रविवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आयोजित