माणिकराव कोकाटे यांचे कृषीमंत्रीपद जाणार, कोण होणार नवे कृषीमंत्री?

मुंबई: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे विधानसभेतील रमी प्रकरण राजकारणात चांगलेच तापले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी दिवसागणिक जोर धरू लागली आहे. मात्र, मी काही चुकीचे केलेच नाही असे म्हणत कोकाटे यांनी कृषिमंत्री पदाचा राजीनामा देणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, आता कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याऐवजी मकरंद पाटील यांना कृषी खातं सोपवण्यात येऊ शकतं असा अंदाज आहे.


रमी प्रकरणाविषयी कोकाटे यांनी आपली बाजू स्पष्ट जरी केली असली तरी, त्यांच्या काही वक्तव्यामुळे पक्षाने त्यांच्याविषयी नाराजी देखील व्यक्त केली आहे. त्यामुळेच त्यांचे मंत्रीपद ताबडतोब रद्द केले जाणार नाही, मात्र त्यांना कृषी खात्याच्या जबाबदारीतून हटवले जाणार असल्याचे म्हंटले जात आहे. त्याऐवजी त्यांना सध्या मकरंद पाटील यांच्याकडे असलेले मदत आणि पुनर्वसन खातं सोपवले जाईल, असा अंदाज आहे.


विधानपरिषदेत रमी खेळणे,शेतकऱ्यांसंदर्भात वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणे यामुळे माणिकराव कोकाटेंविषयी नाराजी वाढत चालली आहे. तसेच त्यांची वक्तव्य सरकारला अडचणीत टाकणारी ठरत आहेत. पण म्हणून त्यांना मंत्रीपदावरून तात्काळ काढणे योग्य ठरणार नसल्यामुळे, फक्त त्यांच्या खात्यात बदल केले जाणार असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मत आहे.



मकरंद पाटील यांच्या खांद्यावर सोपवणार कृषीमंत्री पदाची धुरा ?


गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य तसेच सभागृहात रमी खेळत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने महायुतीतील मंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे. तसेच राज्यभरात विविध ठिकाणी कोकाटे यांच्याविरोधात रस्त्यावरती अनेक आंदोलनंही झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा एकंदरच खूप अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली असतानाच आता कोकाटे यांचं मंत्रीपदाचं खात बदलणार असल्याची माहिती समोर येत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच दुसरे मंत्री असलेले मकरंद आबा पाटील यांच्याकडे असलेलं मदत व पुनर्वसन खातं हे कोकाटे यांना मिळू शकतं. तर कृषीमंत्रीपदाची धुरा ही मकरंद पाटील यांच्या खांद्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. तसेच हा प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे

नवले पुलावर भीषण अपघात, तीन वाहनांनी घेतला पेट, सात जणांचा मृत्यू!

चालत्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबला, भरधाव कार मागून धडकली, कारच्या मागून दुसरा कंटेनर घुसला पुणे : पुणे शहरात

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली 'सोलर शाळा'

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य आणि ‘रोझी ब्लू

इंदुरीकर महाराज सोशल मीडियावरील टीकेने व्यथित, कीर्तन बंद करण्याचा दिला इशारा!

मुंबई : वारकरी संप्रदायातील समाजप्रबोधनकार आणि कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार

जमीन घोटाळा चौकशीसाठी अजित पवारांचा राजीनामा घ्या; अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना जमीन घोटाळ्याची चौकशी नीट होऊ शकेल का? असा सवाल करून मुख्यमंत्री

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी खुशखबर! "कोणी 'माईचा लाल' आला तरी...योजनेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांना एकनाथ शिंदेंचा सडेतोड इशारा

मुंबई : राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) महिला