पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

ठाणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटना वाढण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आरोग्य विभागास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी नागरिकांना सर्पदंशासंदर्भात योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तत्काळ उपचाराचे महत्त्व समजावून सांगत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

*सर्पदंश झाल्यास काय करावे?*


• रुग्णाला शक्य तितके स्थिर व शांत ठेवावे

• रुग्णाची हालचाल टाळावी, शक्य असल्यास उचलून घ्यावे

• दंश झालेला अवयव हृदयाच्या खाली ठेवावा

• जखमेवर साफ कपड्याने हलका दाब द्यावा – कसून बांधणे टाळा

• तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात रुग्णाला पोहोचवा

• श्वासोच्छ्वास अडचण असल्यास – CPR/ऑक्सिजन सुविधा वापरा (उपलब्ध असल्यास)

• शक्य असल्यास सापाचा फोटो घ्या (पण सापाला हात लावू नका)

• सर्पदंशाची वेळ लक्षात ठेवा

*सर्पदंश झाल्यास काय करू नये?*


• पारंपरिक उपचारांवर (जडीबुटी, मंत्र, झाडफळं) विश्वास ठेवू नका

• जखमेवर चिरा करू नका, विष शोषू नका

• बर्फ किंवा गरम पाण्याचा वापर टाळा

• रुग्णास खाणे/पिणे देऊ नका

• वेदनाशामक, झोपेची औषधे किंवा मद्य देऊ नका

• सापाला पकडू किंवा मारू नका

• जखम कसून बांधू नका, त्यामुळे रक्ताभिसरण थांबते

*प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध सुविधा:*


• ASV (Anti Snake Venom) उपलब्ध

• प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी

• अॅड्रेनालिन, अट्रोपीन, निओस्टिगमीन व इतर आवश्यक औषधे

• २४x७ उपचाराची व्यवस्था

*नागरिकांना आवाहन:*


• रात्री बूट, टॉर्च, काठी वापरून बाहेर पडा

• परिसर स्वच्छ ठेवा, झाडेझुडपे व ओला कचरा हटवा

• झोपताना मच्छरदाणीचा वापर करा

• शेतात काम करताना गमबूट वापरा

• रात्री चालताना जोरात पावले टाका – साप दूर राहतात

• झोपताना शक्य असल्यास उंचावर झोपा

• मुलांवर विशेष लक्ष ठेवा

• १०२ / १०८ क्रमांकावर तत्काळ संपर्क साधा
Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस