पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

ठाणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटना वाढण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आरोग्य विभागास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी नागरिकांना सर्पदंशासंदर्भात योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तत्काळ उपचाराचे महत्त्व समजावून सांगत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

*सर्पदंश झाल्यास काय करावे?*


• रुग्णाला शक्य तितके स्थिर व शांत ठेवावे

• रुग्णाची हालचाल टाळावी, शक्य असल्यास उचलून घ्यावे

• दंश झालेला अवयव हृदयाच्या खाली ठेवावा

• जखमेवर साफ कपड्याने हलका दाब द्यावा – कसून बांधणे टाळा

• तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात रुग्णाला पोहोचवा

• श्वासोच्छ्वास अडचण असल्यास – CPR/ऑक्सिजन सुविधा वापरा (उपलब्ध असल्यास)

• शक्य असल्यास सापाचा फोटो घ्या (पण सापाला हात लावू नका)

• सर्पदंशाची वेळ लक्षात ठेवा

*सर्पदंश झाल्यास काय करू नये?*


• पारंपरिक उपचारांवर (जडीबुटी, मंत्र, झाडफळं) विश्वास ठेवू नका

• जखमेवर चिरा करू नका, विष शोषू नका

• बर्फ किंवा गरम पाण्याचा वापर टाळा

• रुग्णास खाणे/पिणे देऊ नका

• वेदनाशामक, झोपेची औषधे किंवा मद्य देऊ नका

• सापाला पकडू किंवा मारू नका

• जखम कसून बांधू नका, त्यामुळे रक्ताभिसरण थांबते

*प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध सुविधा:*


• ASV (Anti Snake Venom) उपलब्ध

• प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी

• अॅड्रेनालिन, अट्रोपीन, निओस्टिगमीन व इतर आवश्यक औषधे

• २४x७ उपचाराची व्यवस्था

*नागरिकांना आवाहन:*


• रात्री बूट, टॉर्च, काठी वापरून बाहेर पडा

• परिसर स्वच्छ ठेवा, झाडेझुडपे व ओला कचरा हटवा

• झोपताना मच्छरदाणीचा वापर करा

• शेतात काम करताना गमबूट वापरा

• रात्री चालताना जोरात पावले टाका – साप दूर राहतात

• झोपताना शक्य असल्यास उंचावर झोपा

• मुलांवर विशेष लक्ष ठेवा

• १०२ / १०८ क्रमांकावर तत्काळ संपर्क साधा
Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध