पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

ठाणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटना वाढण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आरोग्य विभागास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी नागरिकांना सर्पदंशासंदर्भात योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तत्काळ उपचाराचे महत्त्व समजावून सांगत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

*सर्पदंश झाल्यास काय करावे?*


• रुग्णाला शक्य तितके स्थिर व शांत ठेवावे

• रुग्णाची हालचाल टाळावी, शक्य असल्यास उचलून घ्यावे

• दंश झालेला अवयव हृदयाच्या खाली ठेवावा

• जखमेवर साफ कपड्याने हलका दाब द्यावा – कसून बांधणे टाळा

• तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात रुग्णाला पोहोचवा

• श्वासोच्छ्वास अडचण असल्यास – CPR/ऑक्सिजन सुविधा वापरा (उपलब्ध असल्यास)

• शक्य असल्यास सापाचा फोटो घ्या (पण सापाला हात लावू नका)

• सर्पदंशाची वेळ लक्षात ठेवा

*सर्पदंश झाल्यास काय करू नये?*


• पारंपरिक उपचारांवर (जडीबुटी, मंत्र, झाडफळं) विश्वास ठेवू नका

• जखमेवर चिरा करू नका, विष शोषू नका

• बर्फ किंवा गरम पाण्याचा वापर टाळा

• रुग्णास खाणे/पिणे देऊ नका

• वेदनाशामक, झोपेची औषधे किंवा मद्य देऊ नका

• सापाला पकडू किंवा मारू नका

• जखम कसून बांधू नका, त्यामुळे रक्ताभिसरण थांबते

*प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध सुविधा:*


• ASV (Anti Snake Venom) उपलब्ध

• प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी

• अॅड्रेनालिन, अट्रोपीन, निओस्टिगमीन व इतर आवश्यक औषधे

• २४x७ उपचाराची व्यवस्था

*नागरिकांना आवाहन:*


• रात्री बूट, टॉर्च, काठी वापरून बाहेर पडा

• परिसर स्वच्छ ठेवा, झाडेझुडपे व ओला कचरा हटवा

• झोपताना मच्छरदाणीचा वापर करा

• शेतात काम करताना गमबूट वापरा

• रात्री चालताना जोरात पावले टाका – साप दूर राहतात

• झोपताना शक्य असल्यास उंचावर झोपा

• मुलांवर विशेष लक्ष ठेवा

• १०२ / १०८ क्रमांकावर तत्काळ संपर्क साधा
Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार