वसईच्या कळंब समुद्र किनारी आढळला संशयास्पद कंटेनर; पोलिसांकडून तपास सुरू

नालासोपारा: वसई पश्चिमेच्या कळंब समुद्र किनारी एक संशयास्पद कंटेनर वाहून आल्याचे आढळून आला आहे. मंगळवारी सकाळी समुद्र किनारी गेलेल्या नागरिकांना बेवारस स्थितीत समुद्राच्या लाटांत घंटागळ्या खात असलेला हा कंटनेर दिसून आल्याने हा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांकडून याचा तपास सुरू करण्यात आला आहे.


वसई पश्चिमेच्या कळंब समुद्रकिनाऱ्यावर, मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. मंगळवारी सकाळी या समुद्रकिनाऱ्यावर एक मोठा कंटनेर वाहून आल्याचे नागरिकांना दिसून आले. या घटनेमुळे खळबळ उडाली. नागरिकांनी याची माहिती तात्काळ नालासोपारा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.


या कंटनेर पाहण्यासाठी नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर गर्दी केली आहे. हा कंटेंनर एखाद्या मालवाहतूक करणाऱ्या जहाजातून पडला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण