रत्नागिरी जिल्ह्याला २३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येत्या २३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज असून नदीकाठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या कोकणातील तिन्ही जिल्ह्यांना आगामी काही दिवसांत जोरदार पावसाचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


विशेषतः २३ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांतील रहिवाशांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाचे आवाहन असून, पर्यटकांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणीपातळी वाढली असून, काही ठिकाणी नदी व धरणे भरून वाहू लागली आहेत. शुक्रवारपर्यंत पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर शनिवारी व रविवारी जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला.


काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, अनेक ठिकाणी घरांना व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही घरांच्या भिंती कोसळल्याच्या, तसेच पाण्यामुळे जनावरांचे व शेतीचे नुकसान झाल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. दरम्यान, या दमदार पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, भात लावणीला मोठा वेग मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर भात लावणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या