रत्नागिरी जिल्ह्याला २३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

  89

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येत्या २३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज असून नदीकाठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या कोकणातील तिन्ही जिल्ह्यांना आगामी काही दिवसांत जोरदार पावसाचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


विशेषतः २३ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांतील रहिवाशांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाचे आवाहन असून, पर्यटकांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणीपातळी वाढली असून, काही ठिकाणी नदी व धरणे भरून वाहू लागली आहेत. शुक्रवारपर्यंत पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर शनिवारी व रविवारी जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला.


काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, अनेक ठिकाणी घरांना व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही घरांच्या भिंती कोसळल्याच्या, तसेच पाण्यामुळे जनावरांचे व शेतीचे नुकसान झाल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. दरम्यान, या दमदार पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, भात लावणीला मोठा वेग मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर भात लावणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या

दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाकडून लैंगिक अत्याचार

जळगाव : दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घडली. जळगावच्या पाचोरा

निफाडमध्ये चक्क कुत्र्यानेच बिबट्याला नेले फरपटत

निफाड : संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत असल्याचे नागरिकांना पशुधन सांभाळण्यासाठी जागता पहारा द्यावा लागत आहे.