रत्नागिरी जिल्ह्याला २३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येत्या २३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज असून नदीकाठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या कोकणातील तिन्ही जिल्ह्यांना आगामी काही दिवसांत जोरदार पावसाचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


विशेषतः २३ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांतील रहिवाशांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाचे आवाहन असून, पर्यटकांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणीपातळी वाढली असून, काही ठिकाणी नदी व धरणे भरून वाहू लागली आहेत. शुक्रवारपर्यंत पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर शनिवारी व रविवारी जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला.


काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, अनेक ठिकाणी घरांना व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही घरांच्या भिंती कोसळल्याच्या, तसेच पाण्यामुळे जनावरांचे व शेतीचे नुकसान झाल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. दरम्यान, या दमदार पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, भात लावणीला मोठा वेग मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर भात लावणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

Comments
Add Comment

HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी; HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर...

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर अजूनही तुमच्या गाडीला नवीन नंबरप्लेट बसवून घेतली नसेल तर तुमचे

Jalna Black Magic News: जालन्यात एका हॉटेलसमोर लिंबू आणि बाहुल्या आढळल्या, काळ्या जादूने गावात खळबळ

जालना: जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोकरदन तालुक्यामध्ये एका अज्ञात महिलेने हॉटेलसमोर

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू