Prakash Abitkar : कामगार विमा योजनेतील रुग्णालयांबाबत केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

मुंबई : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयांच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली.


राज्यातील कामगार रुग्णालयामध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असून राज्यातील कामगार रुग्णालयासंबंधीत प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी, गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्यात याव्यात, अशी मागणी आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केली. त्यांनी भेटीदरम्यान केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांचे महाराष्ट्रातील ESIC रुग्णालयांच्या सद्यस्थितीकडे विशेष लक्ष वेधले. केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांनी लवकरच अंधेरी येथील ESIC रुग्णालयास आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांच्यासमवेत संयुक्त भेट देण्याचे आश्वासन दिले. तसेच, राज्यातील सर्व ESIC रुग्णालयांबाबत एक सविस्तर आढावा बैठक घेण्याचेही त्यांनी सांगितले.


कर्मचारी विमाधारक (IP) संख्या वाढवण्याबाबत डॉ.मांडविया यांनी सकारात्मकता दर्शवली. यासाठी सध्याची उत्पन्न मर्यादा रू.२१,००० वरून रू.३०,००० पर्यंत वाढवण्यावर सकारात्मक चर्चा झाली. या निर्णयामुळे अधिक कामगार ESIC च्या आरोग्य सुविधांचा लाभ घेऊ शकतील. कामगार व त्यांचे कुटुंबीयांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी राज्याला अधिक निधी देण्याची विनंती आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी केली. सद्यस्थितीत २१,०००/- हजार रुपये मासिक उत्पन्न असलेल्या कामगारांना विमा योजनेचा लाभ घेता येतो. ही उत्पन्न मर्यादा ३०,०००/- हजार रुपये पर्यंत वाढवण्याची मागणी यावेळी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांकडे करण्यात आली. उत्पन्नाची मर्यादा वाढवल्यास विमाधारक कर्मचाऱ्यांची संख्याही वाढेल तसेच अनेक कामगारांना या योजनेचा लाभ घेता येईल.



राज्यात कामगार विमा सोसायटीची पंधरा रुग्णालये असुन योजनेची संलग्नित असलेल्या ४५० खाजगी रुग्णालये व १३४ सेवा दवाखान्याच्या माध्यमातून कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते. राज्यात सद्यस्थितीत ४८ लाख ७० हजार ४६० विमाधारक कामगार असुन, कामगार व त्यांचे कुटुंबीय मिळून सुमारे दोन कोटी नागरिक विमा योजनेचा लाभ घेतात. केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री यांच्या भेटीत उल्हासनगर, अंधेरी, कोल्हापूर येथील बांधकामांची सद्यस्थिती, विविध ठिकाणी सुरू असलेल्या रुग्णसेवा बाबतची चर्चा झाली.


अंधेरी, कोल्हापूर आणि उल्हासनगर येथील ESIC रुग्णालयांची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करून ती कार्यान्वित करण्यासाठी ESIC महासंचालकांना सूचना देण्यात येतील, असेही डॉ. मांडविया यांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील ESIC रुग्णालयाची श्रेणीवाढ करण्याबाबतही विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.


केंद्रीय मंत्री श्री.मनसुख मांडविया यांनी सर्व प्रश्नांच्या सोडवणुकी बाबतीत सकारात्मक चर्चा केली. तसेच राज्याचे आरोग्य मंत्री यांच्या समवेत मुंबईतील अंधेरी येथील ESIS रुग्णालयास संयुक्त भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले आहे. राज्यातील सर्व ESIC रुग्णालयांबाबत एक सविस्तर आढावा बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या, असेही केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले. या भेटीमुळे महाराष्ट्रातील ESIC आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणाला गती मिळेल आणि विमाधारक कर्मचाऱ्यांसाठी उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होतील, असे आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी या भेटीबाबत सांगितले. या भेटीच्या वेळी आरोग्य सचिव वीरेंद्र सिंग, ESIS चे आयुक्त रमेश चव्हाण व इतर अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि