Monsoon Session of Parliament : संसदेचं अधिवेशन सुरू! पावसाळी अधिवेशन देशासाठी गौरवाचं अधिवेशन : पंतप्रधान नरेंद्र मोदी

बॉम्ब, बंदूक, पिस्तुलसमोर संविधानाचा विजय होतोय : पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली : पाऊस प्रत्येक कुटुंबीयांच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. येणाऱ्या काळात याचा देशाला फायदा होईल. हे पावसाळी अधिवेशन देशासाठी गौरवाचं अधिवेशन ठरेल, असं सांगतानाच बॉम्ब, बंदूक आणि पिस्तुलासमोर आपल्या संविधानाचा विजय होत आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.


संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. सभागृह सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी माध्यमांना संबोधित करत म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले. आम्ही ऑपरेशन सिंदूर अंतर्गत २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, जगाने भारताची लष्करी शक्ती पाहिली. जगाने भारताची लष्करी शक्ती पाहिली. पंतप्रधान पुढे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने ठरवलेले लक्ष्य १०० टक्के साध्य झाले. मेड इन इंडिया लष्करी शक्तीचे एक नवीन रूप दाखवले आहे. आपण भेटणाऱ्या जगातील लोकांमध्ये मेड इन इंडियाकडे आकर्षण वाढत आहे. जर संसदेने एका सुरात विजयाची घोषणा केली तर देशवासीयांना प्रेरणा मिळेल. यासोबतच, संशोधन, नवोन्मेष, संरक्षण उपकरणे बळकट होतील. पाऊस प्रत्येक कुटुंबीयांच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. येणाऱ्या काळात याचा देशाला फायदा होईल. हे पावसाळी अधिवेशन देशासाठी गौरवाचं अधिवेशन ठरेल, असं सांगतानाच बॉम्ब, बंदूक आणि पिस्तुलासमोर आपल्या संविधानाचा विजय होत आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. ISSवर भारताचा तिरंगा फडकावणे हा देशवासीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे.





'नक्षलवाद आणि माओवादाची व्याप्ती कमी होत आहे'


पंतप्रधान म्हणाले की, आज आपले सुरक्षा दल नक्षलवाद संपवण्यासाठी एका नवीन आत्मविश्वासाने आणि दृढनिश्चयाने पुढे जात आहेत. आज अनेक जिल्हे नक्षलवादापासून मुक्त आहेत. देशात माओवाद आणि नक्षलवादाची व्याप्ती आकुंचन पावत आहे. बंदुकीसमोर आपल्या देशाचे संविधान जिंकत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. पूर्वी रेड झोन असलेले झोन आता देशासाठी ग्रीन झोन बनत आहेत आणि या अधिवेशनात संपूर्ण देश प्रत्येक खासदाराकडून देशाचे कौतुक ऐकेल.



'देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने'


भारताच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की पूर्वी आपण जगातील १० व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होतो, परंतु आता आपण त्याला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणार आहोत. भारत आपल्या सामर्थ्याने जागतिक व्यासपीठावर कूच करत आहे. पंतप्रधान म्हणाले, '२०१४ मध्ये जेव्हा तुम्ही सर्वांनी आम्हाला आर्थिक क्षेत्राची जबाबदारी दिली तेव्हा देश नाजूक पाचच्या टप्प्यातून जात होता. २०१४ पूर्वी आपण जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावर होतो. आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे...'



२५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर आले


पंतप्रधान असेही म्हणाले, '२०१४ पूर्वी देशात एक काळ असा होता जेव्हा महागाईचा दर दोन अंकी होता. आज हा दर सुमारे दोन टक्क्यांपर्यंत खाली आल्यामुळे देशातील सामान्य लोकांच्या जीवनात दिलासा आणि सुविधा निर्माण झाल्या आहेत. २५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर आले आहेत, ज्याचे जगातील अनेक संघटना कौतुक करत आहेत...'



तिसऱ्या अर्थव्यवस्थेच्या दारात


पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचाही यावेळी उल्लेख केला. पूर्वी आपण जगात १०व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होतो. आता आपण जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहोत. भारत जगातील प्रत्येक मंचावर विकासाची दस्तक देत आहे, असंही ते म्हणाले.

Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत