रेल्वे आणि म्हाडा हद्दीतच वाढतात अनधिकृत बांधकामे; मुंबईतील वाढत्या अतिक्रमणांवरील कारवाईला जबाबदार कोण?

मुंबई : मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर कारवाईत म्हाडा आणि रेल्वेच्या जागांवरील झोपड्यांचीच मोठी समस्या आहे. या भागांतील झोपड्यांचे इमले वाढतच जात असून या वाढत्या झोपड्यांवर कारवाई होत नसल्याने महापालिकेला आपल्या हद्दीतच कारवाई करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कारवाईला गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना रेल्वे आणि म्हाडासह इतर प्राधिकरणांच्या जागांवरील अतिक्रमित आणि अनधिकृत बांधकांमावर बोट दाखवून कारवाईला विरोध केला जात असल्याचे बोलले जात आहे.


नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये यापुढे मुंबईसह इतर शहरांमध्ये अनधिकृत बांधकाम होणार नाही. आता या अनधिकृत बांधकामांना फुलस्टॉप लागलाच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे नगरविकास मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.



मुंबईत रेल्वेच्या हद्दीमध्ये तसेच म्हाडाच्या आणि मुंबई पोर्ट ट्रस्टसह इतर मालकीच्या जमिनींवर वसलेल्या झोपड्यांवर कारवाईची जबाबदारी ही संबंधित प्राधिकरणाची असते. परंतु, म्हाडा किंवा रेल्वे यासारख्या संबंधित प्राधिकरणाकडून वेळेत कारवाई होत नाही. परिणामी कच्ची बांधलेली झोपडी पुढे पक्की होते, मग त्यावर पोटमाळा चढवला जातो, या पोटमाळ्यावर आणखी एक एक माळा अशाप्रकारे माळ्यांवर माळे चढवले जात आहे. वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील गरीब नवाज नगर असो वा दहिसर असा वा मालाड वा माहिम, वडाळा, कुर्ला तसेच पुढे प्रत्येक स्थानकांच्या जवळ झोपड्यांवर कारवाई न झाल्याने आता याठिकाणी झोपड्यांचे टॉवर तयार झाले आहे. तर बेहराम पाडा, भारत नगर आदींसह अनेक म्हाडाच्या जागांवर झोपड्यांचे अतिक्रमण झाले असून या वाढत्या अतिक्रमणांनंतरही म्हाडाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने या जागांवर झोपड्यांचे टॉवर तयार होत आहे.


मुंबईतील काही जाणकारांच्या मते, एका बाजुला महापालिका प्रशासन आपल्या हद्दीतील झोपड्यांवर कारवाई करायला जातात, तेव्हा राजकीय पक्षांकडून म्हाडा आणि रेल्वेच्या जागांवर वाढणाऱ्या आणि मजल्यांवर मजले चढवले जात असतानाही त्यावर कारवाई होत नाही. आमच्या झोपडयांवर कारवाई कसे करतात असा सवाल करत विरोध केला जातो. म्हाडा आणि रेल्वेच्या बहुतांशी जागांवर मुस्लिम आणि परप्रांतियांकडून झोपड्यांची उंची वाढवली जात आहे. यामध्ये बहुतांशी मुस्लिम वस्तींमध्येच अतिक्रमण करून झोपड्या वाढवल्या जात असताना संबंधित प्राधिकरणांकडून त्यावर कारवाई केली जात नसल्याने महापालिकेला आपल्या हद्दीतील अतिक्रमणांवर कारवाई करणे अडचणींचे ठरत आहे. त्यामुळे महापालिकेला मुंबईत अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी म्हाडासह रेल्वेच्या हद्दीतील झोपड्यांवर कारवाई करणे तसेच अतिक्रमणांवर कारवाई करणे ही अत्यंत आवश्यक बाब मानली जात आहे.आज महापालिकेसह रेल्वे आणि म्हाडा या सरकारी यंत्रणा केवळ नोटिसा पाठवण्याचे काम करतात, परंतु प्रत्यक्ष तोडकामाला टाळाटाळ करतात, अशी वस्तुस्थिती आहे. मुंबईला अनधिकृत बांधकामांपासून मुक्त करण्यासाठी प्रशासनाला सर्व प्राधिकरणांशी समन्वय साधून कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

Comments
Add Comment

कुपर रुग्णालयाविरुद्धच्या सततच्या तक्रारीमुळे BMC चा मोठा निर्णय, रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा

मुंबई: विलेपार्ले येथील डॉ. आरएन कूपर हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून सतत येणाऱ्या

मुंबईतील दहिसर पूर्व येथे इमारतीत भीषण आग : वृद्ध महिलेचा मृत्यू , अनेक जखमी

मुंबई : दहिसर पूर्व येथील जनकल्याण एस.आर.ए. इमारतीच्या सातव्या मजल्यावर अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ

लालबागच्या राजाच्या विसर्जनाला का होतोय उशीर ?

मुंबई : सेलिब्रेटी, खेळाडू, राजकारणी यांच्यासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन

मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, विजेचा धक्का लागून ५ जण गंभीररित्या भाजले; एकाचा मृत्यू

मुंबई: मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान एक दुःखद घटना घडली आहे. साकीनाका येथील खैराणी रोडवरील एस.जे. स्टुडिओजवळ

Lalbaug visarjan 2025: मुंबईच्या एकतेचे दर्शन: लालबागचा राजा आणि भायखळ्याची हिंदुस्तानी मशीद Video पहाच..

मुंबई: आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना, मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्यात एक अनोखे आणि

मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणारा 'बिहारी' नोएडात सापडला

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या उत्सवाच्या एक दिवस आधी मुंबईच्या वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या एका