दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी समस्या निर्माण करत आहे. पुणे-सातारा मार्गावर जवळपास 50 किलोमीटरच्या पट्ट्यात वाहनांची गती मंदावलेली आहे. प्रवाशांना तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे, तर लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


हायवेवर वाहतुकीच्या कोंडीचे मुख्य कारण म्हणजे अनेक ठिकाणी रुंदीकरणाचे अपूर्ण काम आणि काही भागांमध्ये वाहतुकीसाठी दिलेल्या डायव्हर्जनमुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांना नेहमीच्या दोन ते तीन तासांच्या प्रवासासाठी दुप्पट वेळ लागतो आहे, अशी अनेक वाहनचालकांनी तक्रार केली.


टोलनाक्यांवरही आज संपूर्ण दिवस वाहतूक खूप जास्त प्रमाणात दिसून आली. विशेषतः कोल्हापूरकडून पुणे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर दुपारपासून मोठी गर्दी होती. काही प्रवाशांनी सांगितले की, “आम्ही मागील दोन तासांपासून हायवेवर अडकलेलो आहोत, रांग कधी संपणार तेच कळत नाही. मुलांसह प्रवास अतिशय त्रासदायक झाला आहे.”


प्रशासनाने आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काही ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकांची तैनाती केली आहे. तरीही, दिवाळीनंतरच्या परतीच्या प्रवासामुळे पुढील दोन–तीन दिवसांपर्यंत हायवेवर गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे.


अपूर्ण रुंदीकरण, वाढलेली वाहनसंख्या आणि व्यवस्थापनातील त्रुटी ही ही परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनवत आहेत. नागरिकांचा असा आग्रह आहे की, महामार्ग प्राधिकरण आणि पोलिसांनी तातडीने अतिरिक्त पथके तैनात करून वाहतुकीचे नियंत्रण मजबूत करावे.

Comments
Add Comment

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण