कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ उडाली. शंकर गल्लीतील १७ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २०५ च्या हॉलमध्ये आग लागली होती. सकाळी सुमारे ७:४५ वाजता आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने (एमएफबी) तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि फक्त २० मिनिटांत, म्हणजेच सकाळी ८:०५ वाजता आग आटोक्यात आणली.


अग्निशमन दलाच्या जवानांनी जिन्याचा वापर करून इमारतीतील आठ रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. यामध्ये दोन पुरुष, तीन महिला आणि तीन मुलांचा समावेश होता. सुटका करण्यात आलेल्यांपैकी चिंतन अभय कोठारी (४५), ख्याती चिंतन कोठारी (४२) आणि ज्योती अभय कोठारी (६६) या तिघांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने मालाड येथील तुंगा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, असे रुग्णालय प्रशासनाने कळवले. उर्वरित पाच जणांना किरकोळ दुखापती झाल्या असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. या आगीत हॉलमधील इलेक्ट्रिक वायरिंग, फर्निचर आणि लाकडी वस्तूंचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.



जोगेश्वरीतील बहुमजली व्यावसायिक इमारतीला आग


मुंबईत याच आठवड्यात दुसरी मोठी आग जोगेश्वरी उपनगरातील जेएनएस बिझनेस सेंटरमध्ये लागली. गुरुवारी सकाळी १०.५० च्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे तब्बल १७ जणांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या सर्वांना वैद्यकीय मदत द्यावी लागली. जोगश्वरीच्या १३ मजली व्यावसायिक इमारतीच्या ९व्या ते १३व्या मजल्यांपर्यंत ज्वाळा पसरल्या होत्या. चौथ्या मजल्यापासून १३व्या मजल्यापर्यंत विद्युत डक्टमधून धूर आणि ज्वाळा पसरल्याने परिस्थिती गंभीर बनली.


या ठिकाणी १२ अग्निशमन गाड्या आणि विविध यंत्रणा तैनात करून आग विझवण्याचे काम हाती घेण्यात आले. अग्निशमन दलाने हायड्रॉलिक शिडीच्या मदतीने दोन महिलांसह २७ जणांना सुरक्षित बाहेर काढले. तरीही दाट धुरामुळे श्वास घेता न आल्याने १७ जणांचा त्रास झाला. उर्वरित नऊ जणांवर एचबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मुंबईत काही दिवसांपासून सलग लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही घटनांमधून सुरक्षाव्यवस्थेच्या तपासणीची आणि विद्युत यंत्रणांच्या देखभालीची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर

Central Railway New Rule : 'धूम्रपान ते फेरीवाले…' रेल्वेत गैरप्रकार करणाऱ्यांची खैर नाही; रेल्वे कायद्यात झाले 'हे' मोठे बदल

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्या

Maharashtra Rojgar Melava 2026 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी! राज्यात होणार १ हजार रोजगार मेळावे; मंत्री मंगलप्रभात लोढांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व

Nitesh Rane : रत्नागिरीला मिळणार जागतिक ओळख! भगवती बंदरात अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलला गती; पर्यटन, रोजगाराला मोठी चालना

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर (Bhagwati Port) येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल (cruise terminal)