इस्लामपूर आता ईश्वरपूर... नाव बदलण्यावरून विरोधकांची गरळ! नितेश राणे म्हणाले...

"सरकारने हिंदू जनतेचे ऐकले आहे."


मुंबई: महाराष्ट्र सरकारने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून 'ईश्वरपूर' केले आहे. महायुती सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांनी नेहमीप्रमाणे गरळ ओकायला सुरुवात केली आहे. नाव बदलण्यावरून एकीकडे सत्ताधारी पक्ष याला 'हिंदुत्वाचा विजय' म्हणत आहे, तर दुसरीकडे विरोधक सरकारवर विकासापासून लक्ष विचलित करण्याचा आरोप करत आहे. मंत्री नितेश राणे यांनी इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर ठेवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.


नितेश राणे म्हणाले की, स्थानिक लोकांच्या मागणीमुळे हे नाव बदलण्यात आले आहे. हिंदू संघटनांनी यापूर्वी रॅली काढली होती. हे आमचे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि सरकारने हिंदू जनतेचे ऐकले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.



हे इस्लामाबाद किंवा पाकिस्तान नाही. हिंदू राष्ट्राला फक्त हिंदू नावे असावीत.


मंत्री आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत म्हटले की, स्थानिक लोकांच्या मागणीमुळे हे नाव बदलण्यात आले आहे. हिंदू संघटनांनी यापूर्वी एक रॅली काढली होती. हे आमचे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि सरकारने हिंदू लोकांच्या मागण्या ऐकल्या आहेत. आपला देश भारत आहे जिथे हिंदू राहतात, येथे इस्लामपूर हे नाव कसे असू शकते? हे इस्लामाबाद किंवा पाकिस्तान नाही. हिंदू राष्ट्राला फक्त हिंदू नावे असावीत.

उद्धव ठाकरे यांची सरकारच्या निर्णयावर टीका


उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णयावर टीका करताना म्हणाले, "नाव बदलणे ठीक आहे पण सरकारने त्यांचे कामही बदलले पाहिजे.  गुंडगिरी करणारे लोक सरकारभोवती फिरत राहतात, त्यांनाही बदललायला  पाहिजे. काही चांगल्या लोकांना सरकारमध्ये घेतले पाहिजे."

काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी देखील सरकारवर टीका करत म्हटले की, जर तुम्हाला नाव बदलायचे असेल तर ते बदला पण किमान शहरात काही विकास तरी करा. शहरात रस्ते आणि पाण्याची मोठी समस्या आहे पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. तुम्ही फक्त नाव बदलून लोकांना मूर्ख बनवत आहात.



'आम्ही आमचा भूतकाळ पुनर्संचयित करत आहोत'


केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नाव बदलण्याच्या निर्णयाला ऐतिहासिक सुधारणा म्हटले. ते म्हणाले, अशा अनेक ठिकाणांना यापूर्वीही बदलण्यात आले आहे. आपल्या ऐतिहासिक ठिकाणांची नावे पुसून टाकण्यात आली होती. आता त्यांना पूर्वीचीच नावे मिळत आहेत. जे खूप चांगले होत आहे. याद्वारे, आपण आपला भूतकाळ पुनर्संचयित करत आहोत.


Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त