इस्लामपूर आता ईश्वरपूर... नाव बदलण्यावरून विरोधकांची गरळ! नितेश राणे म्हणाले...

"सरकारने हिंदू जनतेचे ऐकले आहे."


मुंबई: महाराष्ट्र सरकारने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून 'ईश्वरपूर' केले आहे. महायुती सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांनी नेहमीप्रमाणे गरळ ओकायला सुरुवात केली आहे. नाव बदलण्यावरून एकीकडे सत्ताधारी पक्ष याला 'हिंदुत्वाचा विजय' म्हणत आहे, तर दुसरीकडे विरोधक सरकारवर विकासापासून लक्ष विचलित करण्याचा आरोप करत आहे. मंत्री नितेश राणे यांनी इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर ठेवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.


नितेश राणे म्हणाले की, स्थानिक लोकांच्या मागणीमुळे हे नाव बदलण्यात आले आहे. हिंदू संघटनांनी यापूर्वी रॅली काढली होती. हे आमचे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि सरकारने हिंदू जनतेचे ऐकले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.



हे इस्लामाबाद किंवा पाकिस्तान नाही. हिंदू राष्ट्राला फक्त हिंदू नावे असावीत.


मंत्री आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत म्हटले की, स्थानिक लोकांच्या मागणीमुळे हे नाव बदलण्यात आले आहे. हिंदू संघटनांनी यापूर्वी एक रॅली काढली होती. हे आमचे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि सरकारने हिंदू लोकांच्या मागण्या ऐकल्या आहेत. आपला देश भारत आहे जिथे हिंदू राहतात, येथे इस्लामपूर हे नाव कसे असू शकते? हे इस्लामाबाद किंवा पाकिस्तान नाही. हिंदू राष्ट्राला फक्त हिंदू नावे असावीत.

उद्धव ठाकरे यांची सरकारच्या निर्णयावर टीका


उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णयावर टीका करताना म्हणाले, "नाव बदलणे ठीक आहे पण सरकारने त्यांचे कामही बदलले पाहिजे.  गुंडगिरी करणारे लोक सरकारभोवती फिरत राहतात, त्यांनाही बदललायला  पाहिजे. काही चांगल्या लोकांना सरकारमध्ये घेतले पाहिजे."

काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी देखील सरकारवर टीका करत म्हटले की, जर तुम्हाला नाव बदलायचे असेल तर ते बदला पण किमान शहरात काही विकास तरी करा. शहरात रस्ते आणि पाण्याची मोठी समस्या आहे पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. तुम्ही फक्त नाव बदलून लोकांना मूर्ख बनवत आहात.



'आम्ही आमचा भूतकाळ पुनर्संचयित करत आहोत'


केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नाव बदलण्याच्या निर्णयाला ऐतिहासिक सुधारणा म्हटले. ते म्हणाले, अशा अनेक ठिकाणांना यापूर्वीही बदलण्यात आले आहे. आपल्या ऐतिहासिक ठिकाणांची नावे पुसून टाकण्यात आली होती. आता त्यांना पूर्वीचीच नावे मिळत आहेत. जे खूप चांगले होत आहे. याद्वारे, आपण आपला भूतकाळ पुनर्संचयित करत आहोत.


Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास