तीन मुलांसह आई वडिलांनी विष पिऊन केली आत्महत्या

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर अली आहे . तीन मुलांसह आई वडिलांनी विष पिऊन आत्महत्या केली आहे . ही सामूहिक आत्महत्येची घटना आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे. विपुल वाघेला (३२), त्यांची पत्नी सोनल (२६) आणि त्यांची मुले करीना (११), मयूर (८) आणि राजकुमारी (५) अशी या मृतांची नावे आहेत .


विपुल वाघेला आणि त्याचं संपूर्ण कुटुंब आज सकाळी त्यांच्या अहमदाबादमधील घरात मृतावस्थेत आढळलं. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली . पोलिसांनी या पाचही जणांना रुग्णालयात नेलं . पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत . या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तसंच शवविच्छेदनासाठी हे मृतदेह पाठवण्यात आले आहेत. आर्थिक अडचणीमुळे हे घडल्याचं बोललं जातं आहे .



गेल्या काही दिवसांपासून वाघेला कुटुंबाला आर्थिक अडचणी जाणवत होत्या. बंगोडारा या ठिकाणी ते भाडे तत्त्वावर असलेल्या घरात राहात होते. विपुल वाघेला रिक्षा चालक होते आणि त्यांच्या घरात कमाई करणारे ते एकटेच होते. विपुलने कर्ज काढून रिक्षा विकत घेतली होती. आर्थिक अडचणी भासत असल्याने विपुल आणि त्याची पत्नी कायमच तणावात असायचे. बहुदा याच कारणामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं. असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे .

Comments
Add Comment

Sangli Bailgada Race : धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली! 'हेलिकॉप्टर बैज्या अन् ब्रेक फेल' जोडीने सांगलीत मारले मैदान; पुढच्यावर्षी विजेत्याला थेट BMW कार मिळणार

सांगली : सांगलीमध्ये चंद्रहार पाटील (Chandrahaar Patil) यांनी आयोजित केलेल्या 'श्रीनाथ केसरी' बैलगाडी शर्यतीचा अंतिम निकाल

तेजस लढाऊ विमानांसाठी मोठा करार!

भारत अमेरिकेकडून ११३ जीई इंजिन खरेदी करणार,  स्वदेशी जेट उत्पादनाला मिळणार चालना हैदराबाद : हिंदुस्तान

राज्यात तापमानाचा पारा घसरला! महाबळेश्वरपेक्षा जळगावात थंडी वाढली

मुंबई: हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या हिमवृष्टीमुळे मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा

पंढरपुरातील पांडुरंगाच्या नवीन लाकडी रथाचे प्रस्थान

कोकणातील कारागिरांनी पूर्ण केले पवित्र कार्य पंढरपूर : पंढरपूर येथील श्री क्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी टीईटी परीक्षेकरिता आधुनिक तंत्राचा वापर

मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) बोगस उमेदवारांसह इतर कोणतेही गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य परीक्षा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी ब्रिटिश सरकारकडे करणे अपेक्षित होते का ?

सरसंघचालक मोहन भागवत यांचा काँग्रेसला सवाल मुंबई : "आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये झाली; मग आम्ही ब्रिटिश सरकारकडे