तीन मुलांसह आई वडिलांनी विष पिऊन केली आत्महत्या

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर अली आहे . तीन मुलांसह आई वडिलांनी विष पिऊन आत्महत्या केली आहे . ही सामूहिक आत्महत्येची घटना आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे. विपुल वाघेला (३२), त्यांची पत्नी सोनल (२६) आणि त्यांची मुले करीना (११), मयूर (८) आणि राजकुमारी (५) अशी या मृतांची नावे आहेत .


विपुल वाघेला आणि त्याचं संपूर्ण कुटुंब आज सकाळी त्यांच्या अहमदाबादमधील घरात मृतावस्थेत आढळलं. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली . पोलिसांनी या पाचही जणांना रुग्णालयात नेलं . पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत . या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तसंच शवविच्छेदनासाठी हे मृतदेह पाठवण्यात आले आहेत. आर्थिक अडचणीमुळे हे घडल्याचं बोललं जातं आहे .



गेल्या काही दिवसांपासून वाघेला कुटुंबाला आर्थिक अडचणी जाणवत होत्या. बंगोडारा या ठिकाणी ते भाडे तत्त्वावर असलेल्या घरात राहात होते. विपुल वाघेला रिक्षा चालक होते आणि त्यांच्या घरात कमाई करणारे ते एकटेच होते. विपुलने कर्ज काढून रिक्षा विकत घेतली होती. आर्थिक अडचणी भासत असल्याने विपुल आणि त्याची पत्नी कायमच तणावात असायचे. बहुदा याच कारणामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं. असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे .

Comments
Add Comment

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार; कामशेतमध्ये दुकानाच्या चेंजिंग रूममध्ये.....

पुणे : पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरात दुकानांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी