WCL 2025 : भारत - पाकिस्तान सामना रद्द, भारताचा पुढील सामना कोणासोबत आणि कधी होणार ?


बर्मिंगहॅम : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ मधील भारत - पाकिस्तान सामना रद्द झाला आहे. दोन्ही देशांमधील भू राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा सामना रद्द झाला आहे.


एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला आणि २६ नागरिकांची हत्या केली. या घटनेनंतर भारत - पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ मधील भारत - पाकिस्तान सामना रद्द झाला आहे.


वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ मधील भारताचा पुढील सामना मंगळवार २२ जुलै २०२५ रोजी होणार आहे. इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स असा हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजता या सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे. स्टार स्पोर्ट्स 1 या टीव्ही वाहिनीवर सामन्याचे थेट प्रक्षेपण होईल. तसेच फॅनकोड अॅपवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. सामना नॉर्थहॅम्प्टन येथे होणार आहे.


Comments
Add Comment

Commonwealth Games 2026 : भारताने पदाकाचे खाते उघडले, झंडू कुमारला पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक

ग्लासगो : भारताने २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांच्या दुसऱ्या दिवसाचा शेवट एका पदकासह आणि अनेक दमदार कामगिरींसह

ISSF World Cup : आयएसएसएफ विश्वचषक: सैन्यमने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये पटकावले रौप्यपदक

नवी दिल्ली : भारताची नेमबाज सैन्यम हिने चीनमधील हांगझोउ येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक

Judoka Tulika Maan : ज्युदोपटू तुलिका मानचे 'नाडा'कडून तात्पुरते निलंबन

नवी दिल्ली : भारताची आघाडीची ज्युदोपटू तुलिका मान हिला 'नाडा'च्या (National Anti-Doping Agency

FIDE Interim President : विश्वनाथन आनंद फिडेचे हंगामी अध्यक्ष

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित युरोपियन युनियनच्या प्रतिबंधांच्या यादीत विद्यमान अध्यक्ष आर्काडी

Asian Cup Schedule 2026 : एशियन गेम्स २०२६ चे वेळेपत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान सामना कधी होणार ?

मुंबई : एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धा

Ind vs Afg : भारत-अफगाणिस्तान मालिकेत इतिहास घडणार! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडणार

मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सप्टेंबर २०२६ मध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या