'गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करू'

शहरी नक्षलवाद्यांचा डाव हाणून पाडू


पेण : गणेशोत्सव, दहीहंडी, नागपंचमी अशा हिंदू सणांच्या विरोधात षडयंत्र रचले जाते. हा शहरी नक्षलवाद्यांचा डाव आहे. आपण तो हाणून पाडू आणि यावेळी राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करु असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केले. गणपतीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण येथील हमरापूर, जोहे, कळवे या गावातील मूर्तीकारांच्या विविध संघटनातर्फे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचा तांबडशेत येथे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री आशिष शेलार म्हणाले की, पीओपीच्या मूर्तीवरील बंदीबाबत ठरवून षडयंत्र केले गेले. तत्कालीन काँग्रेस आणि आताची महाविकास आघाडी हे सगळेच त्यात सामील होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि आम्ही मूर्तीकार बांधवांच्या सोबतीने एकजुटीने लढलो आणि जिंकलो देखील. हा विजय आपल्या पारंपारिक सणांच्या जपणुकीसाठी खूप महत्त्वाचा होता.

गेली काही वर्षे हिंदुत्वाचा प्रतीक असलेला सार्वजनिक गणेशोत्सवाचा सण हा बंद करण्याचा जणू घाटच घातला आहे. या षडयंत्रात काँग्रेस, राष्‍ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उबाठा सेना सहभागी असून हा शहरी नक्षलवाद्यांचा अजेंडा आहे. याची सुरूवात २००३ साली झाली जेव्हा नैसर्गिक जलस्त्रोतावर होणारे हिंदूंचे अत्यंविधी आणि अन्य संस्कार विधी बंद करावे अशी मागणी करीत एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली. .या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करताना तत्कालीन आघाडी सरकारने पीओपीच्या गणेशमूर्तीचा विषय यामध्ये घुसवला. त्याचवेळी जर तत्कालीन सरकाने या याचिकेला विरोध केला असता तर एवढा मोठा लढा देण्याची वेळ आली नसती, असे सांगत भाजपाने दिलेल्या न्यायालयासह विविध पातळीवरील लढ्याची संपूर्ण माहिती या भाषणात शेलार यांनी दिली. तसेच यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा करुया असे सांगत आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव घोषित केला असून त्याची रुपरेषा देखील ही यावेळी त्यांनी जाहीर केली.
Comments
Add Comment

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय