रायगडच्या पायरीमार्गावरील बंदी शिथिल

महाड : किल्ले रायगडचा पायरी मार्गाचा वापर १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी काढले होते. मात्र आता या आदेशात शिथिलता दिली गेली आहे. त्यामुळे किल्ले रायगडचा पायरी मार्ग सुरू झाला असून केवळ अतिवृष्टी व रेड किंवा ऑरेंज ॲलर्टच्या काळात हा पायरी मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.


आगामी पावसाळ्यामध्ये दगडी वारंवार पडण्याच्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसून दगडी पडून कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये, याकरिता पायरी मार्ग बंद करण्यात आला होता. किल्ले रायगडवर येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांच्या जीवावर या परिसरातील छोटे मोठे व्यवसाय अवलंबून असून पावसाळ्यातील दोन तीन महिने जर पायरी मार्ग बंद असेल, तर पर्यटकांची संख्या कमी होत असल्याने येथील व्यवसायिकांच्या धंद्यावर परिणाम होऊन त्यांची उपासमार होत असते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात केवळ अतिवृष्टी अथवा रेड व यलो अलर्ट असेल तरच पायरी मार्ग बंद ठेवावा अशी मागणी येथील व्यवसायिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत होती. यावर्षी जिल्हाधिकारी यांनी १५ ऑगस्टपर्यंत पायरी मार्ग बंद करण्याचे आदेश काढल्यानंतर या व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त केली गेली व पायरी मार्ग खुला करण्यात यावा अशी मागणी केली गेली. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी रायगड यांनी पूर्वीच्या आदेशात शिथिलता आणत केवळ अतिवृष्टी आणि रेड किंवा यलो अलर्ट असेल त्यावेळेस पायरी मार्ग बंद ठेवण्यात असे सुधारीत आदेश काढले आहेत. रेड आणि ऑरेंज अलर्ट त्याचप्रमाणे अतिवृष्टी होत असतानाच्या काळात नाणे दरवाजा, चित्त दरवाजा आणि किल्ले रायगडवर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेशही स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Raksha Bandhan AI Prompts : रक्षाबंधन होईल अतिशय खास! फक्त हे सोपे AI Prompts वापरा अन् बनवा भावा-बहिणीचे सर्वात सुंदर फोटो

सध्या सोशल मीडियावर AI फोटो जनरेशनचा मोठा ट्रेंड सुरू आहे. या रक्षाबंधनाला भाऊ आणि बहिणीचे

Nashik : आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवरून वाद, मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा

Nashik : नाशिकच्या दिंडोरी जकात नाका परिसरात आदिवासी कुटुंबाच्या ताब्यातील जमिनीवरील शेड हटवून जागा बळकावण्याचा

Raksha Bandhan Gifts 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला चुकूनही देऊ नका ही गिफ्ट्स; मानली जातात अशुभ!

मुंबई : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, तर

TVJA Dahi Handi : TVJA गोविंदांचा थरार; पत्रकारांच्या एकतेचे दर्शन घडवत दहीहंडी उत्साहात

मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन (TVJA)च्या सदस्यांनी वरळी येथील NSCI डोममध्ये

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत