इस्लामपूर आता ईश्वरपूर... नाव बदलण्यावरून विरोधकांची गरळ! नितेश राणे म्हणाले...

"सरकारने हिंदू जनतेचे ऐकले आहे."


मुंबई: महाराष्ट्र सरकारने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून 'ईश्वरपूर' केले आहे. महायुती सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांनी नेहमीप्रमाणे गरळ ओकायला सुरुवात केली आहे. नाव बदलण्यावरून एकीकडे सत्ताधारी पक्ष याला 'हिंदुत्वाचा विजय' म्हणत आहे, तर दुसरीकडे विरोधक सरकारवर विकासापासून लक्ष विचलित करण्याचा आरोप करत आहे. मंत्री नितेश राणे यांनी इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर ठेवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.


नितेश राणे म्हणाले की, स्थानिक लोकांच्या मागणीमुळे हे नाव बदलण्यात आले आहे. हिंदू संघटनांनी यापूर्वी रॅली काढली होती. हे आमचे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि सरकारने हिंदू जनतेचे ऐकले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.



हे इस्लामाबाद किंवा पाकिस्तान नाही. हिंदू राष्ट्राला फक्त हिंदू नावे असावीत.


मंत्री आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत म्हटले की, स्थानिक लोकांच्या मागणीमुळे हे नाव बदलण्यात आले आहे. हिंदू संघटनांनी यापूर्वी एक रॅली काढली होती. हे आमचे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि सरकारने हिंदू लोकांच्या मागण्या ऐकल्या आहेत. आपला देश भारत आहे जिथे हिंदू राहतात, येथे इस्लामपूर हे नाव कसे असू शकते? हे इस्लामाबाद किंवा पाकिस्तान नाही. हिंदू राष्ट्राला फक्त हिंदू नावे असावीत.

उद्धव ठाकरे यांची सरकारच्या निर्णयावर टीका


उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णयावर टीका करताना म्हणाले, "नाव बदलणे ठीक आहे पण सरकारने त्यांचे कामही बदलले पाहिजे.  गुंडगिरी करणारे लोक सरकारभोवती फिरत राहतात, त्यांनाही बदललायला  पाहिजे. काही चांगल्या लोकांना सरकारमध्ये घेतले पाहिजे."

काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी देखील सरकारवर टीका करत म्हटले की, जर तुम्हाला नाव बदलायचे असेल तर ते बदला पण किमान शहरात काही विकास तरी करा. शहरात रस्ते आणि पाण्याची मोठी समस्या आहे पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. तुम्ही फक्त नाव बदलून लोकांना मूर्ख बनवत आहात.



'आम्ही आमचा भूतकाळ पुनर्संचयित करत आहोत'


केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नाव बदलण्याच्या निर्णयाला ऐतिहासिक सुधारणा म्हटले. ते म्हणाले, अशा अनेक ठिकाणांना यापूर्वीही बदलण्यात आले आहे. आपल्या ऐतिहासिक ठिकाणांची नावे पुसून टाकण्यात आली होती. आता त्यांना पूर्वीचीच नावे मिळत आहेत. जे खूप चांगले होत आहे. याद्वारे, आपण आपला भूतकाळ पुनर्संचयित करत आहोत.


Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह