इस्लामपूर आता ईश्वरपूर... नाव बदलण्यावरून विरोधकांची गरळ! नितेश राणे म्हणाले...

"सरकारने हिंदू जनतेचे ऐकले आहे."


मुंबई: महाराष्ट्र सरकारने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून 'ईश्वरपूर' केले आहे. महायुती सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांनी नेहमीप्रमाणे गरळ ओकायला सुरुवात केली आहे. नाव बदलण्यावरून एकीकडे सत्ताधारी पक्ष याला 'हिंदुत्वाचा विजय' म्हणत आहे, तर दुसरीकडे विरोधक सरकारवर विकासापासून लक्ष विचलित करण्याचा आरोप करत आहे. मंत्री नितेश राणे यांनी इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर ठेवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.


नितेश राणे म्हणाले की, स्थानिक लोकांच्या मागणीमुळे हे नाव बदलण्यात आले आहे. हिंदू संघटनांनी यापूर्वी रॅली काढली होती. हे आमचे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि सरकारने हिंदू जनतेचे ऐकले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.



हे इस्लामाबाद किंवा पाकिस्तान नाही. हिंदू राष्ट्राला फक्त हिंदू नावे असावीत.


मंत्री आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत म्हटले की, स्थानिक लोकांच्या मागणीमुळे हे नाव बदलण्यात आले आहे. हिंदू संघटनांनी यापूर्वी एक रॅली काढली होती. हे आमचे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि सरकारने हिंदू लोकांच्या मागण्या ऐकल्या आहेत. आपला देश भारत आहे जिथे हिंदू राहतात, येथे इस्लामपूर हे नाव कसे असू शकते? हे इस्लामाबाद किंवा पाकिस्तान नाही. हिंदू राष्ट्राला फक्त हिंदू नावे असावीत.

उद्धव ठाकरे यांची सरकारच्या निर्णयावर टीका


उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णयावर टीका करताना म्हणाले, "नाव बदलणे ठीक आहे पण सरकारने त्यांचे कामही बदलले पाहिजे.  गुंडगिरी करणारे लोक सरकारभोवती फिरत राहतात, त्यांनाही बदललायला  पाहिजे. काही चांगल्या लोकांना सरकारमध्ये घेतले पाहिजे."

काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी देखील सरकारवर टीका करत म्हटले की, जर तुम्हाला नाव बदलायचे असेल तर ते बदला पण किमान शहरात काही विकास तरी करा. शहरात रस्ते आणि पाण्याची मोठी समस्या आहे पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. तुम्ही फक्त नाव बदलून लोकांना मूर्ख बनवत आहात.



'आम्ही आमचा भूतकाळ पुनर्संचयित करत आहोत'


केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नाव बदलण्याच्या निर्णयाला ऐतिहासिक सुधारणा म्हटले. ते म्हणाले, अशा अनेक ठिकाणांना यापूर्वीही बदलण्यात आले आहे. आपल्या ऐतिहासिक ठिकाणांची नावे पुसून टाकण्यात आली होती. आता त्यांना पूर्वीचीच नावे मिळत आहेत. जे खूप चांगले होत आहे. याद्वारे, आपण आपला भूतकाळ पुनर्संचयित करत आहोत.


Comments
Add Comment

बेकायदेशीर कत्तलीसाठी नेलेला जनावरांचा कंटेनर परभणीत जप्त, चालक ताब्यात

परभणी : पथरी-माजलगाव रस्त्यावरील पोखर्णी फाटा परिसरात बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा एक कंटेनर सतर्क

गणेशोत्सवाला गालबोट - पुण्यात गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या

पुणे : ऐन गणेश विसर्जनाच्या तयारीत असतानाच पुण्यामध्ये सणाला गालबोट लागले. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या

मराठा आरक्षण - मृतांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत

मुंबई : मराठा समाजास आरक्षण मिळण्याकरीता ज्यांनी आत्महत्या केली किंवा आंदोलना दरम्यान ज्यांचा मृत्यू झाला. अशा

Weather Alert: विसर्जनाच्या दिवशी मुसळधार पाऊस, आयएमडीचा महाराष्ट्रासाठी मोठा इशारा

नवी दिल्ली: आज महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी साजरी केली जात असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनात सर्व

मोठी भरती! महाराष्ट्रात अनुकंपा आधारावर होणार मेगा भरती!, १०,००० रिक्त पदे भरली जाणार

दिवाळीपूर्वी सरकार देणार सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मुंबई: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून

Pune Crime: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलं समोर

पुणे: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत आयुष (गोविंदा) गणेश