इस्लामपूर आता ईश्वरपूर... नाव बदलण्यावरून विरोधकांची गरळ! नितेश राणे म्हणाले...

"सरकारने हिंदू जनतेचे ऐकले आहे."


मुंबई: महाराष्ट्र सरकारने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून 'ईश्वरपूर' केले आहे. महायुती सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांनी नेहमीप्रमाणे गरळ ओकायला सुरुवात केली आहे. नाव बदलण्यावरून एकीकडे सत्ताधारी पक्ष याला 'हिंदुत्वाचा विजय' म्हणत आहे, तर दुसरीकडे विरोधक सरकारवर विकासापासून लक्ष विचलित करण्याचा आरोप करत आहे. मंत्री नितेश राणे यांनी इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर ठेवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.


नितेश राणे म्हणाले की, स्थानिक लोकांच्या मागणीमुळे हे नाव बदलण्यात आले आहे. हिंदू संघटनांनी यापूर्वी रॅली काढली होती. हे आमचे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि सरकारने हिंदू जनतेचे ऐकले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.



हे इस्लामाबाद किंवा पाकिस्तान नाही. हिंदू राष्ट्राला फक्त हिंदू नावे असावीत.


मंत्री आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत म्हटले की, स्थानिक लोकांच्या मागणीमुळे हे नाव बदलण्यात आले आहे. हिंदू संघटनांनी यापूर्वी एक रॅली काढली होती. हे आमचे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि सरकारने हिंदू लोकांच्या मागण्या ऐकल्या आहेत. आपला देश भारत आहे जिथे हिंदू राहतात, येथे इस्लामपूर हे नाव कसे असू शकते? हे इस्लामाबाद किंवा पाकिस्तान नाही. हिंदू राष्ट्राला फक्त हिंदू नावे असावीत.

उद्धव ठाकरे यांची सरकारच्या निर्णयावर टीका


उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णयावर टीका करताना म्हणाले, "नाव बदलणे ठीक आहे पण सरकारने त्यांचे कामही बदलले पाहिजे.  गुंडगिरी करणारे लोक सरकारभोवती फिरत राहतात, त्यांनाही बदललायला  पाहिजे. काही चांगल्या लोकांना सरकारमध्ये घेतले पाहिजे."

काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी देखील सरकारवर टीका करत म्हटले की, जर तुम्हाला नाव बदलायचे असेल तर ते बदला पण किमान शहरात काही विकास तरी करा. शहरात रस्ते आणि पाण्याची मोठी समस्या आहे पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. तुम्ही फक्त नाव बदलून लोकांना मूर्ख बनवत आहात.



'आम्ही आमचा भूतकाळ पुनर्संचयित करत आहोत'


केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नाव बदलण्याच्या निर्णयाला ऐतिहासिक सुधारणा म्हटले. ते म्हणाले, अशा अनेक ठिकाणांना यापूर्वीही बदलण्यात आले आहे. आपल्या ऐतिहासिक ठिकाणांची नावे पुसून टाकण्यात आली होती. आता त्यांना पूर्वीचीच नावे मिळत आहेत. जे खूप चांगले होत आहे. याद्वारे, आपण आपला भूतकाळ पुनर्संचयित करत आहोत.


Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी