असल्फा देवराळ परिसरात पाण्याची समस्या जटिल

मुंबई : असल्फा परिसरात दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा संपूर्ण भाग देवराळ परिसरातून पाण्याची समस्या नेहमीच उद्भवत असते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन माजी नगरसेवक किरण लांडगे, विजयेन्द्र शिंदे व ईश्वर तायडे यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगर जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांच्या दालनात बैठक पार पडली.


यावेळी साने गुरुजी नगर, लालबत्ती, हनुमान टेकडी, नारायण नगर, मराठवाडा चाळ, दत्त मंदिर परिसर, ओम साई धाम सोसायटी, वीर बजरंग क्रीडा मंडळ, भिम नगर, छत्रपती शिवाजी नगर, नवलादेवी मित्र मंडळ या भागातील पाणी प्रश्नाबाबत असलेल्या वेगवेगळ्या अडचणी सोडवण्याबाबत निवेदन देण्यात आले. त्यात प्रामुख्याने पाण्याचा प्रेशर वाढविणे, अधिक क्षमतेचा पाणीपुरवठा पंप बसविणे, पाण्याची टाकी स्वच्छ करणे, टाकीची संरक्षण भिंत बांधणे, तसेच नवीन पाण्याची लाइन टाकणे इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला आहे.




हा सर्व परिसर डोंगराळ भाग असून पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या करिता मोर्चा, आंदोलने या माध्यमातून अनेक वेळा लढा दिला असून जनतेच्या हक्काचे पाणी त्यांना मिळून देणारच
- किरण लांडगे, ( माजी नगरसेवक )


Comments
Add Comment

मी परकी नाही, उत्तर भारतीय मराठीच आहे’; मैथिली ठाकूरची मुंबईत प्रचारात एन्ट्री, मराठी गीताने वेधलं लक्ष

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. प्रचाराला १०० तासांपेक्षा कमी कालावधी

मतदान करा आणि हॉटेलमध्ये जावून कमी पैशात खा - मतदार जानजागृतीसाठी आहार संघटनेचा पुढाकार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदारांमध्ये

निवडणुकीच्या कामांसाठी गैरहजर राहणाऱ्यांविरोधात सोमवारपासून पोलिस कारवाई

तब्बल ६,८७१ कर्मचारी,अधिकाऱ्यांना नोटीस सोमवारपासून साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या घरी पोलिसांचे समन्स मुंबई

दादरच्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची दूरवस्था

सत्ता काळात दुर्लक्ष, निवडणूक जवळ येताच उबाठाला झाली आठवण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे

मेट्रो-९ मुळे अंधेरीतून थेट काशीगावपर्यंत प्रवास

दहिसर ते भाईंदर टप्प्यातील सुरक्षा तपासणीला सुरुवात मुंबई : दहिसर ते मिरारोड अंतर कमी करून या परिसरातील वाहतूक

उबाठा आणि काँग्रेसला मुंबई महापालिका कळलीच नाही!

२५ वर्षं सत्ता आणि विरोधी पक्षांत राहून दिली कामांची फक्त आश्वासने मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी