पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले, ८ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन

मुंबई : गोंधळ, गदारोळ, सभात्याग, सत्ताधारी-विरोधक आमने-सामने, हाणामारी या आणि अशा विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखेर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन आज सूप वाजले. आता विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, 8 डिसेंबर रोजी नागपुरात होणार आहे, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.


राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना हिवाळी अधिवेशनाच्या तारखेबद्दलचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. तसेच राज्यपालांनी दिलेल्या संदेशानुसार पावसाळी अधिवेशन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा नार्वेकर यांनी केली.


अधिवेशनात झालेल्या कामकाजाचा आढावा सांगताना ते म्हणाले, या काळात एकूण 15 बैठका झाल्या आणि एकुण 133 तास 48 मिनिचे कामकाज झाले, तर 45 मिनिटे वेळ वाया गेली. यात दिवसाचे सरासरी कामकाज 8 तास 55 मिनिटे झाले. यामध्ये एक अभिनंदन प्रस्ताव, सात शोक प्रस्ताव, 8277 तारांकित प्रश्न, स्विकृत प्रश्न 579, उत्तरित झालेले प्रश्न 92, प्राप्त सूचना 8, अस्विकृत सूचना 8, चर्चा 7, सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर प्राप्त सूचना 181, मान्य सूचना 42, त्यातील केवळ पाच विषयांवर चर्चा झाली. विधानसभेत १४ शासकीय विधेयके सादर झाली. १५ विधेयकांवर सहमती झाली, तर एक मागे घेण्यात आले. आमदारांकडून २४८१ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या, त्यातील 511 स्विकृत सूचना करून १५२ सूचनांवर प्रत्यक्ष चर्चा झाली.

Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२