Devendra Fadanvis : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 'हरित वीज क्रांती': मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, १० हजार कोटींची बचत होणार!

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. लवकरच महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, जे शेतकऱ्यांना हरित (ग्रीन) वीज पुरवेल. या निर्णयामुळे राज्याच्या शाश्वत विकासाला गती मिळेल आणि वीज खरेदीत १० हजार कोटी रुपयांची बचत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


फडणवीस म्हणाले की, राज्याच्या शाश्वत विकासासाठी एक सविस्तर 'ब्लू प्रिंट' तयार करण्यात आली आहे. सध्या राज्याची ५० टक्के वीज हरित ऊर्जा स्रोतांच्या माध्यमातून तयार केली जात आहे. पुढील पाच वर्षांत विजेचे दर कमी होतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. यापूर्वी दरवर्षी ९.२० टक्क्यांनी विजेचे दर वाढत होते, परंतु आता दरवर्षी ते कमी होतील असे मुख्यमंत्री म्हणाले.



या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत, राज्यातील सुमारे ३० लाख कुटुंबांना विजेचे बिल येणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांना सौर मुक्ती (solar freedom) दिली जाईल. तसेच, शेतकऱ्यांसाठी साडेसात अश्वशक्ती (7.5 HP) ऊर्जा वापरण्याचा निर्णय कायम ठेवला असून, यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध होईल.


या घोषणांमुळे राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक दोघांनाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हरित ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल, तर वीज दरात कपात आणि मोफत वीज योजनेमुळे आर्थिक भार हलका होईल.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी