सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिराची मुभा कर्मचाऱ्यांना

मुंबई : मुंबईतील रेल्वे वाहतुकीवर येणारा ताण कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर विविध उपाययोजनांचा विचार केला जात असतानाच सरकारी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिराने येण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी विधानसभेत दिली. त्याचवेळी या कर्मचाऱ्यांना वाढीव अर्धा तास काम करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणाचे पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. आमदार अतुल भातखळकर यांनी या संदर्भातील लक्षवेधी मांडली. त्यावर उत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. 'मुंबई रेल्वे वाहतुकीवरील ताण वाढता आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आज लोकल पकडण्यासाठी रेल्वे प्रवासी जीव धोक्यात घालत आहेत. त्यातूनच मुंब्रा अपघातासारखी घटना घडली. प्राप्त



राज्य सरकारची विधानसभेत माहिती


'खासगी' कर्मचाऱ्यांच्या वेळेबाबत 'टास्क फोर्स'


'खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांच्या वेळेत करण्यासंदर्भात लवकरच 'टास्क फोर्स' तयार केले जाणार आहे,' अशी घोषणाही सरनाईक यांनी विधानसभेत केली. बदल आकडेवारीनुसार, मुंबईत विविध रेल्वे अपघातांत ७ हजार ५६५ प्रवाशांचा मृत्यू झाला. सुमारे ७ हजार २०० प्रवासी जखमी झाले असून ही बाब भूषणावह नाही. त्यामुळे या घटना कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो रेल्वेशिवाय इतर वाहतूक पर्यायांचा वापर करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे,' असे सरनाईक यांनी यावेळी नमूद केले.



बंद दरवाजांच्या रेल्वेसंख्येत वाढ ?


'एसी लोकल आणि सामान्य लोकलचे तिकिटाच्या दरात तफावत आहे. त्यात सुसूत्रता आणून जास्तीत जास्त बंद दरवाजांच्या रेल्वेच्या संख्येत वाढ करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करत आहेत,' अशी माहितीही सरनाईक यांनी सभागृहात दिली. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



पॉट टॅक्सी आणि जलवाहतुकीचा विचार


'राज्य सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. मुंबईत प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी सरकारने जलवाहतूक, पॉट टॅक्सी आणि रोप वे यांसारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा विचार सुरू केला आहे. परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना करणार आहे,' अशी माहिती सरनाईक यांनी यावेळी दिली.

Comments
Add Comment

Ambernath traffic: महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्गांबद्दल

अंबरनाथ : महाशिवरात्री उत्सवानिमित्त अंबरनाथमधील प्राचीन अंबरेश्वर शिवमंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर

ISRO Science Trip: अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल

- विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणार मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण

NCP Merger: शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे...

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच,

Pune: बांगलादेशच्या झेंड्यावरून फूड स्टॉल्सची तोडफोड; पुण्यातील MIT कॉलेजमध्ये राडा

पुणे: पुण्यातील कोथरुड येथील एमआयटी महाविद्यालयात आयोजित वर्ल्ड कल्चरल फेस्टिवलमध्ये मोठा राडा झाला आहे. फूड

राज्यात हवामानात बदलाचे संकेत; फेब्रुवारीत 'या दिवशी' काही भागांत कोसळणार पावसाच्या सरी

मुंबई : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरडे वातावरण राहिल्यानंतर आता राज्यात हवामानाची घडी बदलताना दिसत आहे.

Nashik MNS Protest: शिक्षकाने मराठी बोलण्यास विरोध केल्याने मनसे कार्यकर्त्यांचा राडा

नाशिक: नाशिकमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. एका प्रसिद्ध कोचिंग क्लासमध्ये मनसे