सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिराची मुभा कर्मचाऱ्यांना

मुंबई : मुंबईतील रेल्वे वाहतुकीवर येणारा ताण कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर विविध उपाययोजनांचा विचार केला जात असतानाच सरकारी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिराने येण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी विधानसभेत दिली. त्याचवेळी या कर्मचाऱ्यांना वाढीव अर्धा तास काम करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणाचे पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. आमदार अतुल भातखळकर यांनी या संदर्भातील लक्षवेधी मांडली. त्यावर उत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. 'मुंबई रेल्वे वाहतुकीवरील ताण वाढता आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आज लोकल पकडण्यासाठी रेल्वे प्रवासी जीव धोक्यात घालत आहेत. त्यातूनच मुंब्रा अपघातासारखी घटना घडली. प्राप्त



राज्य सरकारची विधानसभेत माहिती


'खासगी' कर्मचाऱ्यांच्या वेळेबाबत 'टास्क फोर्स'


'खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांच्या वेळेत करण्यासंदर्भात लवकरच 'टास्क फोर्स' तयार केले जाणार आहे,' अशी घोषणाही सरनाईक यांनी विधानसभेत केली. बदल आकडेवारीनुसार, मुंबईत विविध रेल्वे अपघातांत ७ हजार ५६५ प्रवाशांचा मृत्यू झाला. सुमारे ७ हजार २०० प्रवासी जखमी झाले असून ही बाब भूषणावह नाही. त्यामुळे या घटना कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो रेल्वेशिवाय इतर वाहतूक पर्यायांचा वापर करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे,' असे सरनाईक यांनी यावेळी नमूद केले.



बंद दरवाजांच्या रेल्वेसंख्येत वाढ ?


'एसी लोकल आणि सामान्य लोकलचे तिकिटाच्या दरात तफावत आहे. त्यात सुसूत्रता आणून जास्तीत जास्त बंद दरवाजांच्या रेल्वेच्या संख्येत वाढ करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करत आहेत,' अशी माहितीही सरनाईक यांनी सभागृहात दिली. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



पॉट टॅक्सी आणि जलवाहतुकीचा विचार


'राज्य सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. मुंबईत प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी सरकारने जलवाहतूक, पॉट टॅक्सी आणि रोप वे यांसारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा विचार सुरू केला आहे. परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना करणार आहे,' अशी माहिती सरनाईक यांनी यावेळी दिली.

Comments
Add Comment

Special Trains :नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून धावणार विशेष गाड्या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५

पुण्यात डिजिटल अरेस्टची धमकी देत, ज्येष्ठ नागरिकाची कोटींची फसवणूक

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा

नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह

Amrit Bharat Express Train Routes : मुंबईकरांची चांदी! 'अमृत भारत एक्सप्रेस'ने लांब पल्ल्याचा प्रवास होणार स्वस्त; जाणून घ्या कुठे-कुठे थांबणार गाडी?

मुंबई : भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस' ताफ्यात आता आणखी ९

Ashish Jaiswal : आमदार आशिष जयस्वाल यांच्या पाठपुराव्याला यश; प्रकल्पबाधित तरुण दिनेश हावरे यांचा पोलीस सेवेतील मार्ग मोकळा!

सातारा : नियम आणि प्रशासकीय तांत्रिकतेच्या कचाट्यात अडकलेल्या एका होतकरू तरुणाच्या आयुष्यात अखेर आशेचा नवा

महापालिकेच्या अर्थसंकल्पाची औपचारिकता पूर्ण होणार

स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आयुक्त मांडणार अर्थसंकल्प मुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा