Govinda 2025 : गोविंदांसाठी आनंदाची बातमी! दिड लाख गोविंदांना विमा कवच मिळणार मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : गोविंदांना शासनाकडून मिळणाऱ्या विमा कवचात वाढ करुन ते दिडलाख गोविंदांना देण्यात यावे अशी मागणी करीत आज दहिहंडी समन्वय समितीने मंत्री एँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.


महाराष्ट्र शासनाने दहीहंडी या खेळाला साहसी दर्जा दिल्यापासून दहीहंडीच्या या खेळामध्ये अनेक गोविंदांचा सहभाग वाढला आहे व त्याच बरोबर खेळात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा धोकाही वाढलेला आहे. यास्तव महाराष्ट्र शासनाने मागील दोन वर्षापासून ७५,००० गोविंदांसाठी विमा कवच देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी या वर्षी यामध्ये वाढ करुन १,५०,००० गोविंदांना विमा कवच मिळावे अशी मागणी करीत शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याबाबत क्रिडा विभागाला मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.



शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण पडेलकर, गीता झगडे आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल मंत्री आशिष शेलार यांनी त्यांचे आभार मानले आहे. एका गोविंदाला दुर्दैवाने मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, अपघातग्रस्त असेल तर ५ लाख, अडिचलाख किंवा किरकोळ जखमी असेल तर १ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण