Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : आव्हाड-पडळकर कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची, शेवटी घमासान हाणामारी!

मुंबई : विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आता विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेबाबत सविस्तर अहवाल मागवला आहे.



नेमकं प्रकरण काय घडलं?


विधानभवनाच्या पायऱ्यांवर दोन्ही नेत्यांचे समर्थक आपापल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत होते. यावेळी आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. या घटनेनंतर सभागृहातही पडसाद उमटले. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, विधानसभा अध्यक्षांनी तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालानंतर संबंधित कार्यकर्त्यांवर आणि दोषींवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या परिसरात गोपिचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर काल गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड आमने-सामने आले असता दोन्हीकडून एकमेकांना शिविगाळ करून धमकावण्यात आले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या आवारातच एकमेकांना भिडल्याने या वादाने गंभीर वळण घेतलं आहे.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वेने साजरा केला जागतिक वारसा दिन

मुंबई : मध्य रेल्वेने जागतिक वारसा दिन-२०२६ उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ व मध्य

ATS : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे राज्यातील लाखो वाहतूक व्यावसायिकांना दिलासा

मुंबई : 'एटीएस' (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीतील तांत्रिक बदलांमुळे रखडलेली वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रिया

Uninterrupted Power Supply : अखंड वीजपुरवठ्यासाठी राज्यात होणार ‘एआय’चा वापर

मुंबई : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची विक्रमी मागणी पूर्ण करतानाच, वीजनिर्मिती आणि पुरवठ्यात

Data Centers in Maharashtra : मध्य आशियातील नामांकित कंपन्या महाराष्ट्रात डेटा सेंटर स्थापन करणार

मुंबई : राज्यातील उद्योगस्नेही वातावरणाचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून, मध्य आशियातील डेटा सेंटर

Rain In Maharashtra : उष्माघातानंतर राज्यासमोर वादळी पावसाचे संकट

मुंबई : पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२

New Law : जमीनधारक होणार विकास प्रक्रियेत भागीदार

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या ‘मुंबई ३.०’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मुंबई महानगर