शिवसेनेबरोबर युतीबाबत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निर्णय करू - राज ठाकरे

मनसेचे प्रदेश स्तरावरील शिबिर सुरू, निवडक पदाधिकारी उपस्थित बंद दाराआड चर्चा


इगतपुरी : आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच शिवसेनेसोबत (उबाठा) युती करावयाची की नाही, याबाबत मनसेच्या राज्यस्तरीय शिबिरात चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानुसार शिवसेनेसोबत युतीबाबत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात निर्णय करू, असे सुतोवाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याचे समजते. इगतपुरी येथील कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराला सुरुवात झाली. या शिबिरामध्ये मनसेचे काही निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या शिबिरामध्ये प्रसिद्धी माध्यमांना सहभागी करून न घेता सुरुवात झाली असून राज्यातून शेकडो पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत.


इगतपुरीमध्ये सर्वात जास्त पाऊस पडत असताना देखील या पावसाच्या मोसममध्ये कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये मात्र गरमागरम वातावरण आहे. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुन्हा एकदा बंद दाराआड खलबते शिजत असून या खलबत्त्यात नक्की काय आहे, याबाबतची माहिती मात्र बाहेर पडू नये याची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. राज्यभरातून जिल्हाप्रमुख पक्षाचे प्रदेश स्तरावरील नेते आणि काही निवडक पदाधिकाऱ्यांना सहभागी करण्यात आलेला आहे.


या शिबिरासाठी पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे हे दुपारी दाखल झाले तर पक्ष अध्यक्ष राज ठाकरे हे चार वाजेच्या सुमारास इगतपुरीमध्ये दाखल झाले. त्यानंतर येथील बैठकांना सुरुवात झाली. त्यापूर्वी सर्व पदाधिकारी हे या ठिकाणी दाखल झालेले होते. 16 जुलैपर्यंत हे शिबिर या ठिकाणी सुरू राहणार आहे. शिबिरासाठी कुठल्याही प्रकारची बॅनरबाजी किंवा प्रसिद्धी करण्यात आलेली नाही. प्रसिद्धी माध्यमांना देखील या शिबिरापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लांबच ठेवलेले आहे.

Comments
Add Comment

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ

Ajit Pawar : विमान अपघाताआधी अजित पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या नातलगाला केलेला शेवटचा फोन... काय होते अजित पवारांचे शेवटचे शब्द

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी

Eknath Shinde: कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही; जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!

लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘मितेनी’–‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट