शिवसेनेबरोबर युतीबाबत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निर्णय करू - राज ठाकरे

मनसेचे प्रदेश स्तरावरील शिबिर सुरू, निवडक पदाधिकारी उपस्थित बंद दाराआड चर्चा


इगतपुरी : आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच शिवसेनेसोबत (उबाठा) युती करावयाची की नाही, याबाबत मनसेच्या राज्यस्तरीय शिबिरात चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानुसार शिवसेनेसोबत युतीबाबत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात निर्णय करू, असे सुतोवाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याचे समजते. इगतपुरी येथील कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराला सुरुवात झाली. या शिबिरामध्ये मनसेचे काही निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या शिबिरामध्ये प्रसिद्धी माध्यमांना सहभागी करून न घेता सुरुवात झाली असून राज्यातून शेकडो पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत.


इगतपुरीमध्ये सर्वात जास्त पाऊस पडत असताना देखील या पावसाच्या मोसममध्ये कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये मात्र गरमागरम वातावरण आहे. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुन्हा एकदा बंद दाराआड खलबते शिजत असून या खलबत्त्यात नक्की काय आहे, याबाबतची माहिती मात्र बाहेर पडू नये याची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. राज्यभरातून जिल्हाप्रमुख पक्षाचे प्रदेश स्तरावरील नेते आणि काही निवडक पदाधिकाऱ्यांना सहभागी करण्यात आलेला आहे.


या शिबिरासाठी पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे हे दुपारी दाखल झाले तर पक्ष अध्यक्ष राज ठाकरे हे चार वाजेच्या सुमारास इगतपुरीमध्ये दाखल झाले. त्यानंतर येथील बैठकांना सुरुवात झाली. त्यापूर्वी सर्व पदाधिकारी हे या ठिकाणी दाखल झालेले होते. 16 जुलैपर्यंत हे शिबिर या ठिकाणी सुरू राहणार आहे. शिबिरासाठी कुठल्याही प्रकारची बॅनरबाजी किंवा प्रसिद्धी करण्यात आलेली नाही. प्रसिद्धी माध्यमांना देखील या शिबिरापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लांबच ठेवलेले आहे.

Comments
Add Comment

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे

Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र