चौकच्या ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधिक्षकांकडून कायापालट

परिसरातील रुग्णांसाठी ठरतेय वरदान


अलिबाग : चौक बाजारपेठ व सभोवतालच्या १८ ते २० वाड्या-वस्त्या आणि आजूबाजूच्या नऊ ते दहा गावांसाठी खालापूर तालुक्यातील एकमेव असलेले चौकचे ग्रामीण रुग्णालय हे परिसरातील रुग्णांसाठी वरदान ठरते आहे. चौकच्या ग्रामीण रुग्णालयातील पदभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. सविता काळेल यांनी स्वीकारल्यापासून चौक ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट झाल्याचे दिसून येते आहे.


मोहोपाडा रसायनीसह खालापूर तालुक्यातील अनेक रुग्णांना विविध प्रकारच्या सेवांचा लाभ मिळत असून, रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, दंतचिकित्सक आणि इतर कर्मचारी यांच्या उपलब्धतेत वाढ होण्याबरोबरच रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचे चित्र आहे. बाह्यरुग्ण विभागात दिवसाला किमान १८० ते २००रुग्ण तेथील सेवेचा लाभ घेतात, तसेच ज्या रुग्णांना रुग्णालयात भरतीची आवश्यकता असते, अशांना रुग्णालयात भरती करून पुढील उपचार दिले जातात. अशांची संख्या महिन्याला सरासरी ४५० ते ५०० असते.


आंतर रुग्णांसाठी रुग्णालयात सकस आहार, चहा-नाश्ता, प्युरिफाईड पाणी, आंघोळीसाठी गरम पाणी, मनोरंजनासाठी प्रत्येक वार्डात टीव्ही संच व प्रत्येकाला आयुर्वेदाची माहिती व्हावी यासाठी हर्बल गार्डनही तयार करण्यात आले आहे. आंतर रुग्णांमध्ये प्रसुती महिलांचे प्रमाण देखील वाढल्याचे चित्र असून, सर्व प्रसूत महिलेची व बाळाची बारकाईने या रुग्णालयात सुश्रूषा केली जाते. चौक ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सविता काळेल या स्वतः बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यांच्या उपास्थितीमध्ये लहान मुलांची तपासणी, संगोपन, आहार यावर त्या सल्ला देतात. तसेच रुग्णालयातील विविध विभागांमार्फतही रुग्णांना सेवा देण्यात प्रयोगशाळा विभाग, दल-किरण, नेत्र तपासणी, दंतचिकित्सा, एच.आय.व्ही. तपासणी व समुदेशन आणि राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम पथक यांच्या अंतर्गत खालापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळकरी मुलांचे आरोग्य तपासणी असा करण्यात येते. एखादा अपघात घडल्यास जखमींना रुग्णालयात भरती केले जाते, तर मृतकांना शवविच्छेदनाचीही या सुविधा आहे.


 
Comments
Add Comment

मुंबई-काशिद रो-रो सेवा रखडली

वादळ, वारे, उसळणाऱ्या लाटांमुळे कामात अडथळा नांदगाव मुरुड : मुंबई-काशिद रो-रो सेवेचे गेल्या पाच वर्षांपासून संथ

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी