चौकच्या ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधिक्षकांकडून कायापालट

परिसरातील रुग्णांसाठी ठरतेय वरदान


अलिबाग : चौक बाजारपेठ व सभोवतालच्या १८ ते २० वाड्या-वस्त्या आणि आजूबाजूच्या नऊ ते दहा गावांसाठी खालापूर तालुक्यातील एकमेव असलेले चौकचे ग्रामीण रुग्णालय हे परिसरातील रुग्णांसाठी वरदान ठरते आहे. चौकच्या ग्रामीण रुग्णालयातील पदभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. सविता काळेल यांनी स्वीकारल्यापासून चौक ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट झाल्याचे दिसून येते आहे.


मोहोपाडा रसायनीसह खालापूर तालुक्यातील अनेक रुग्णांना विविध प्रकारच्या सेवांचा लाभ मिळत असून, रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, दंतचिकित्सक आणि इतर कर्मचारी यांच्या उपलब्धतेत वाढ होण्याबरोबरच रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचे चित्र आहे. बाह्यरुग्ण विभागात दिवसाला किमान १८० ते २००रुग्ण तेथील सेवेचा लाभ घेतात, तसेच ज्या रुग्णांना रुग्णालयात भरतीची आवश्यकता असते, अशांना रुग्णालयात भरती करून पुढील उपचार दिले जातात. अशांची संख्या महिन्याला सरासरी ४५० ते ५०० असते.


आंतर रुग्णांसाठी रुग्णालयात सकस आहार, चहा-नाश्ता, प्युरिफाईड पाणी, आंघोळीसाठी गरम पाणी, मनोरंजनासाठी प्रत्येक वार्डात टीव्ही संच व प्रत्येकाला आयुर्वेदाची माहिती व्हावी यासाठी हर्बल गार्डनही तयार करण्यात आले आहे. आंतर रुग्णांमध्ये प्रसुती महिलांचे प्रमाण देखील वाढल्याचे चित्र असून, सर्व प्रसूत महिलेची व बाळाची बारकाईने या रुग्णालयात सुश्रूषा केली जाते. चौक ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सविता काळेल या स्वतः बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यांच्या उपास्थितीमध्ये लहान मुलांची तपासणी, संगोपन, आहार यावर त्या सल्ला देतात. तसेच रुग्णालयातील विविध विभागांमार्फतही रुग्णांना सेवा देण्यात प्रयोगशाळा विभाग, दल-किरण, नेत्र तपासणी, दंतचिकित्सा, एच.आय.व्ही. तपासणी व समुदेशन आणि राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम पथक यांच्या अंतर्गत खालापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळकरी मुलांचे आरोग्य तपासणी असा करण्यात येते. एखादा अपघात घडल्यास जखमींना रुग्णालयात भरती केले जाते, तर मृतकांना शवविच्छेदनाचीही या सुविधा आहे.


 
Comments
Add Comment

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी ‘एआय’चा वापर

वाहनांवर काटेकोर लक्ष रायगड : गणेशोत्सव काळात मुंबई–गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात.

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली