नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?


पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर थोड्याच वेळात विमानतळावरुन पहिल्या विमानाचे उड्डाण होईल, असे सूत्रांकडून समजते. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाची औपचारिक घोषणा लवकरच होणार आहे.


पनवेल ते उलवे दरम्यान ११०० हेक्टरवर पसरलेला ग्रीन फिल्ड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज होत आहे. विमानतळावरील अनेक कामं अंतिम टप्प्यात आहेत. या विमानतळाच्या संरक्षणाची जबाबदारी सीआयएसएफच्या जवानांकडे असेल. उद्घाटनानंतर सुरुवातीला या विमानतळावरुन इंडिगो आणि अकासा एअरलाइन्सच्या विमानसेवा सुरू होतील. लवकरच इतर कंपन्यांच्या विमान सेवांनाही सुरुवात होणार आहे.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची आग्रही मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. या संदर्भातील ठराव राज्य विधिमंडळाने दोन वेळा मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे. पण केंद्राचा निर्णय अद्याप आलेला नाही. आता उद्घाटनाच्या दिवशी किंवा त्याआधी तरी विमानतळाच्या नावाबाबत काही घोषणा होते का याकडे अनेकांचे लक्ष आहे.


दि. बा. पाटील यांची लोकनेते अशी ओळख आहे. नवी मुंबईतील शेतकरी, कष्टकरी यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. तसेच साडेबारा टक्के भूखंडासाठी दि. बा. पाटील यांनी संघर्ष केल्यामुळे हा नियम देशभरात लागू करण्यात आला. देशातील प्रकल्पग्रस्तांना दिबांच्या संघर्षामुळे फायदा झाला. त्यामुळे दिबांचे नाव विमानतळाला देण्याची प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे.


Comments
Add Comment

लालपरीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी ‘पालक अधिकारी’ नेमणार;  मंत्री प्रताप सरनाईक

 मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; प्रत्येक आगाराला उत्पन्नाचे टार्गेट देणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग

Nashik News : कश्यपी धरणात पती-पत्नीसह चौघांचा बुडून मृत्यू

नाशिक : नाशिकच्या कश्यपी धरण (Kashyapi Dam) येथे गेलेल्या पती-पत्नी आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोघा मुलांचा बुडून

Nashik : नाशिकमध्ये कथित बोगस रेशनकार्ड प्रकरणावरून वाद, घुसखोरांना रेशनकार्ड वाटप झाल्याचा आरोप

Nashik : नाशिकमध्ये कथित बोगस रेशनकार्ड प्रकरणावरून वातावरण तापले असून, अखिल भारतीय हिंदू महासभेने या प्रकरणाची

Randhir Singh Passes Away : एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकणारे दिग्गज नेमबाज रणधीर सिंग यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा क्षेत्राला समृद्ध करणारे आणि जागतिक स्तरावर भारताचा दबदबा निर्माण करणारे दिग्गज

श्री प्रयागधाम ट्रस्टच्या वार्षिक भंडारा महोत्सवानिमित्त उरुळी स्थानकावर १६ गाड्यांना तात्पुरता थांबा

उरुळी : जून २०२६ मध्ये उरुळी येथे होणाऱ्या श्री प्रयागधाम ट्रस्टच्या वार्षिक भंडारा महोत्सवानिमित्त

Asaram Bapu :आसाराम बापूला हायकोर्टाचा मोठा झटका

Asaram Bapu : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात आसाराम बापू याला हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. आसाराम बापू याला