रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने एक सकारात्मक आणि समाजाभिमुख पाऊल उचलले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पळस्पे फाटा, राहूल हॉटेल परिसर तसेच मुंबई-पुणे महामार्गावर पडलेले खड्डे बुजवले. या उपक्रमामुळे वाहतूक सुरळीत झाली असून प्रवाशांना सुरक्षित व वेगवान मार्गक्रमण शक्य झाले आहे.

या कार्याची चाकरमानी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून प्रशंसा होत आहे. सणासुदीच्या गर्दीत पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि सामाजिक जाणिव ही "लोकसेवेत पोलीस" हे तत्त्व प्रत्यक्षात उतरवणारी ठरली आहे.

स्थानिकांनी सांगितले की, "पूर्वी तासन्तास वाहतूक कोंडीत अडकावे लागायचे, आता मात्र प्रवास सुकर झाला आहे. पनवेल पोलिसांचा हा उपक्रम खर्‍या अर्थाने कौतुकास्पद आहे."

हा उपक्रम फक्त वाहतूक सुरळीत करण्यापुरताच मर्यादित न राहता, सार्वजनिक हितासाठी पोलिसांची सामाजिक जबाबदारीही अधोरेखित करतो. इतर भागांतील पोलिसांसाठीही हा एक प्रेरणादायक आदर्श ठरू शकतो.
Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा