शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात झालं काय ? चर्चेला उधाण

मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीचा दौरा केला. शिंदे बुधवारच्या रात्रीपासूनच दिल्लीत आहेत. दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. लवकरच होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत नियोजनाच्यादृष्टीने एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याशी काही मुद्यांवर चर्चा केल्याचे वृत्त आहे.

दिवाळीनंतर मुंबई महापालिका तसेच राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकदम होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी करायच्या नियोजनाबाबत एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात सविस्तर चर्चा झाली. उद्धव आणि राज युती करणार की नाही आणि युती झाली तर त्याचा काय परिणाम होईल याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे. काही खासगी संस्थांच्या सर्व्हेचे रिपोर्ट घेऊन शिंदेंनी अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

मागील काही दिवसांत शिवसेनेच्या आमदारांच्या वक्तव्यांमुळे आणि वर्तनामुळे नवनवे वाद निर्माण झाले. हे वाद मिटवावे आणि भविष्यात नवे वाद होऊ नये यासाठी घ्यायच्या काळजीबाबतही एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.
Comments
Add Comment

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन - मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आंदोलनात सहभाग; मनमानी चालू देणार नाही पुल होणारच

मुंबई : चर्नी रोड-गिरगाव पुलाला विरोध करून जनतेला वेठीस धरणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात

गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील संघर्ष पुन्हा उफाळला - मनोमिलन ठरले औटघटकेचे; नवी मुंबईकरांचे भूखंड घशात घातल्याचा आरोप

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील सत्तासमीकरणे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहेत. विशेषतः

Mulund Metro Slab: थेट रिक्षावर कोसळला मेट्रोचा स्लॅब; ३ ते ४ जण जखमी तर एकाच मृत्यू

मुलुंड: मुलूंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा अचानक स्लॅब कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लॅबखाली एका

AC Local : पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! १९ फेब्रुवारीपासून धावणार १२ नवीन एसी लोकल; लोकल फेऱ्यांमध्येही वाढ

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुखकर आणि गारवा देणारा ठरणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी

अंधरेतील पहिल्या पुष्पोत्सवाचे प्रसिद्ध अभिनेते पद्मश्री अक्षय कुमारच्या हस्ते उद्घाटन

भाजपच्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ अभियानांतर्गत अभिनेता अक्षय कुमार यांनी दिलेल्या शहरव्यापी