शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात झालं काय ? चर्चेला उधाण

मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीचा दौरा केला. शिंदे बुधवारच्या रात्रीपासूनच दिल्लीत आहेत. दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. लवकरच होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत नियोजनाच्यादृष्टीने एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याशी काही मुद्यांवर चर्चा केल्याचे वृत्त आहे.

दिवाळीनंतर मुंबई महापालिका तसेच राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकदम होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी करायच्या नियोजनाबाबत एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात सविस्तर चर्चा झाली. उद्धव आणि राज युती करणार की नाही आणि युती झाली तर त्याचा काय परिणाम होईल याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे. काही खासगी संस्थांच्या सर्व्हेचे रिपोर्ट घेऊन शिंदेंनी अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

मागील काही दिवसांत शिवसेनेच्या आमदारांच्या वक्तव्यांमुळे आणि वर्तनामुळे नवनवे वाद निर्माण झाले. हे वाद मिटवावे आणि भविष्यात नवे वाद होऊ नये यासाठी घ्यायच्या काळजीबाबतही एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.
Comments
Add Comment

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

एल्फिन्स्टन पूल पाडण्यासाठी रेल्वेच्या मंजुरीची प्रतीक्षा, पश्चिम रेल्वेची अवाजवी मागणी!

मुंबई : वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या प्रकल्पासाठी एल्फिन्स्टन पुलावरील डांबरी थर काढण्याचे काम पूर्ण झाले असून,

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.