शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात झालं काय ? चर्चेला उधाण

मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीचा दौरा केला. शिंदे बुधवारच्या रात्रीपासूनच दिल्लीत आहेत. दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. लवकरच होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत नियोजनाच्यादृष्टीने एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याशी काही मुद्यांवर चर्चा केल्याचे वृत्त आहे.

दिवाळीनंतर मुंबई महापालिका तसेच राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकदम होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी करायच्या नियोजनाबाबत एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात सविस्तर चर्चा झाली. उद्धव आणि राज युती करणार की नाही आणि युती झाली तर त्याचा काय परिणाम होईल याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे. काही खासगी संस्थांच्या सर्व्हेचे रिपोर्ट घेऊन शिंदेंनी अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

मागील काही दिवसांत शिवसेनेच्या आमदारांच्या वक्तव्यांमुळे आणि वर्तनामुळे नवनवे वाद निर्माण झाले. हे वाद मिटवावे आणि भविष्यात नवे वाद होऊ नये यासाठी घ्यायच्या काळजीबाबतही एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.
Comments
Add Comment

आताची सर्वात मोठी बातमी: भारत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला!

मोहित सोमण: भारताच्या प्रातिनिधिक स्वरूपात अर्थव्यवस्थेचे जगभरात कौतुक होत असताना आता सरकारने आणखी एक मोठी

२०२५ मधील शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजीच, आज तेजी का राहील? वाचा आजची टेक्निकल पोझिशन

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. सेन्सेक्स १९५ व निफ्टी ८०.८५ अंकांने

मनसे युतीचा फटका; वरळी, परळ, कुर्ला, वांद्रे पूर्व, विक्रोळीत उबाठा गटात राजीनामा नाट्य सुरुच

मुंबई : उबाठा आणि मनसेच्या युतीमध्ये झालेल्या जागा वाटपात उबाठाच्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली गेली

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश

कुणाचा पत्ता कापला, कुणाची बंडखोरी तर कुणाचा पक्षप्रवेश

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विविध

नवी मुंबई विमानतळावर पहिल्याच पाच दिवसांत प्रवासी संख्या २६ हजारांवर

सुट्टीच्या दिवसांत प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ नवी मुंबई : देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील नवा मानबिंदू