विधानभवनात पडळकर-खोतांनी फाडला बनावट दुधाचा बुरखा! नाव न घेता साधला जयंत पाटलांवर निशाणा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दूध भेसळीचा मुद्दा तापला आहे! भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आज विधानभवन परिसरातच दूध भेसळ कशी होते, याचा 'लाईव्ह डेमो' दाखवून सर्वांनाच धक्का दिला. युरिया, तेल, चुना आणि केमिकल्स वापरून एक लिटर दुधाचे चक्क दहा लिटर दूध कसे बनवले जाते, हे त्यांनी प्रात्यक्षिकासह दाखवले. या 'दूध माफिया'ंवर कठोर कारवाई करण्याची आणि अजामीनपात्र जन्मठेपेची मागणीही त्यांनी केली.



'एका मोठ्या पुढाऱ्याची डेअरी!' - पडळकरांचा जयंत पाटलांवर निशाणा?


गोपीचंद पडळकर यांनी थेटपणे आरोप केला की, "युरिया आणि तेलाचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार केले जाते. हे सर्व आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळाले आहे. तिथे एका मोठ्या पुढाऱ्याची दूध डेअरी आहे. राज्याचे पुढारी म्हणतात, पण तुम्ही काय करत आहात?" असा सवाल उपस्थित करत पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.


पडळकर म्हणाले, "शेतकरी दुधात भेसळ करत नाहीत, तर डेअरीवालेच भेसळ करून गब्बर झाले आहेत. हे शेतकरी आणि ग्राहकांशी खेळत आहेत. एक लाख लिटर दूध गोळा झाले की त्याचे तीन लाख लिटर दूध डेअरीवाले तयार करतात, म्हणजे एक लिटरचे दहा लिटर दूध तयार होत आहे. अशा सर्वांना तुरुंगात टाकले पाहिजे आणि दूध भेसळीबाबत कडक कायदा तयार करण्यात यावा."



सदाभाऊ खोत यांची मागणी: 'जन्मठेप झालीच पाहिजे!'


सदाभाऊ खोत यांनीही पडळकरांच्या मागणीला दुजोरा दिला. ते म्हणाले, "राज्यात म्हशीचं ८० ते ९० लाख लिटर आणि गाईचं १ कोटी २५ लाख लिटर दूध तयार होतं. पण भेसळयुक्त दूध बाजारात मोठ्या प्रमाणात येत असल्याने शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही. मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दुधाच्या दरात कमिशन मिळते. दूध माफिया शेतकरी आणि ग्राहकांना लुटून त्यांच्या जीवाशी खेळत आहेत. अशांना कडक शिक्षा, अजामीनपात्र जन्मठेप झालीच पाहिजे, तरच शेतकरी वाचेल."



'लाइव्ह डेमो'ने विधानभवन हादरले!


भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानभवन परिसरात चक्क एक मिक्सर, दूध आणि पाण्याच्या बाटल्या, चुना आणि काही केमिकल्स घेऊन येत, दूध भेसळ कशी केली जाते, याचे प्रात्यक्षिकच दाखवले. दुधात तेल, चुना आणि वासासाठी केमिकल वापरून ते कसे बनावट दूध तयार करतात, याचा त्यांनी सविस्तर 'डेमो' दिला.


पडळकर यांनी यावेळी मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये सर्रास भेसळयुक्त दूध विकलं जात असल्याचा आरोप केला. "शेतकऱ्यांना दुधाला दर मिळाला पाहिजे, म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे. या भेसळीमुळे लोकं मरायला लागली आहेत. लहान मुलांना हे दूध पाजले जाते. कॅन्सर किंवा इतर रोग वाढण्यामागे हे केमिकल्स जबाबदार आहेत. सरकारने तात्काळ यावर निर्णय घ्यावा," अशी कळकळीची विनंती त्यांनी केली.


शेतकरी आणि सामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या दूध माफियांचा पर्दाफाश केल्याबद्दल पडळकर आणि खोत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता सरकार यावर काय कठोर पाऊल उचलते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी' चेहरा समोर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात.