Jan Surksha Bill : कोणाचाही आंदोलनाचा अधिकार काढलेला नाही… जनसुरक्षा विधेयकाबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुंबई : जनसुरक्षा विधेयक हे विधासभेमध्ये काल मंजूर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हे विधेयक मांडलं. या विधेयकामुळे देशविरोधी कृत्यांना आळा घालता येणार असल्याचं त्यांनी म्हटलं. आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याच विधेयकासंदर्भात महत्वाची माहिती दिली. हे बिल कुठल्याही लोकतांत्रिक पद्धतीच्या विरोधात नाही. कोणाचाही आंदोलनाचा अधिकार हे काढून घेत नाही. नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत, त्या ऑर्गनायझेशनना बॅन करण्यासाठी हे बिल तयार करण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केलं.



जनसुरक्षा विधेयकाबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री ?


?si=9Mxbpg__5Bkn4xne

जनसुरक्षा विधेयक काल विधासभेने मंजूर केलं याचा आनंद आहे. काल चर्चेच्या दरम्यान या विधेयकाबद्दल ज्या काही शंका होत्या, त्या सर्वांचं उत्तर मी दिलेल आहे. हे विधेयक पारित करताना अतिशय लोकशाही पद्धत आम्ही स्वीकारली , या संदर्भात २६ लोकांची जॉईंट सिलेक्ट कमिटी त्यात विरोधी पक्षाचे सगळे प्रमुख नेते होते, या कमिटीकडे ते विधेयक गेलं, त्या कमिटीने लागोपाठ बैठका घेतल्या. त्यात जे सजेशन्स आले, ते आम्ही स्वीकारले. १२ हजार वेगवेगळ्या लोकांनी सजेशन्स दिले होते, ते आपण त्यात इन-कॉर्पोरेट केले, त्यातून कमिटीचा जो अहवाल कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सादर केला, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यावर आधारित बिल आपण काल मांडलं, त्या बिलाच्या चर्चेदरम्यान हे स्पष्टपणे दाखवून दिलं की हे बिल कुठल्याही लोकतांत्रिक पद्धतीच्या विरोधात नाही. कोणाचाही आंदोलनाचा अधिकार हे काढून घेत नाही. लोकशाही आणि भारताचं संविधान मानणाऱ्या कोणत्याही संस्थेवर किंवा संघटनेवर घाला घालणारं हे बिल नाही. केवळ आणि केवळ नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत, त्या ऑर्गनायझेशनना बॅन करण्यासाठी हे बिल तयार करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं.


४ राज्यांनी यापूर्वी अशा प्रकारचं विधेयक आधीच मंजूर केलं आहे आणि केंद्र सरकारने नक्षलग्रस्त सर्व राज्यांना अशा प्रकारचं विधेयक मंजूर करण्यास सांगितलं आहे, असं फडणवीस यांनी नमूद केलं. या विधेयकामध्ये ज्या तरतुदी आहेत, त्या तरतुदी नसल्यामुळे इतर राज्यांनी ज्या संस्था, संघटनांना बॅन केलंय त्या राजरोसपणे महाराष्ट्रात ऑपरेट करत आहेत, कारण आपल्याकडे त्यांच्यावर कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नाही. माओवादी संघटनांनी कशाप्रकारे आपलं ऑपरेशन अर्बनमध्ये केलं हेही लक्षात आणून दिलं असं मुख्यमंत्री म्हणाले.

Comments
Add Comment

Mumbai Metro : एमएमआरडीए मेट्रोचा नवा विक्रम! ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार; अवघ्या १७९ दिवसांत शेवटचे ५ कोटी प्रवासी

मार्गिका २अ, ७, २ब (टप्पा-१) आणि ९ (टप्पा-१) वर वाढता प्रतिसाद; सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या २.७९ लाखांवर मुंबई :

Mangalagaur 2026 : यंदा श्रावणात कधी साजरी होणार मंगळागौर ? जाणून घ्या पूजा पद्धत, ५ वर्षांची परंपरा आणि पौराणिक कथा!

मुंबई : श्रावण महिना उजाडला की महाराष्ट्रात महिलांना वेध लागतात ते म्हणजे अत्यंत उत्साहाच्या आणि मांगल्याच्या

Anil Deshmukh : अनिल देशमुखांवर 'मनी लाँड्रिंग'चा खटला चालवण्यास 'ईडी'ला राज्यपालांची मंजुरी

मुंबई : बार आणि रेस्टॉरंटमधून कथित १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राज्याचे

DY Patil Passed Away : ज्यांच्या दूरदृष्टीने भारताला दिले 'हे' ऐतिहासिक मैदान; जिथे भारतीय महिला संघाने जिंकला पहिला वर्ल्ड कप!

नवी मुंबई : देशातील उच्च शिक्षण संस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि 'पद्मश्री' विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील

Pre Marriage Verification : बायोडेटा खरा की खोटा? कर्ज, शिक्षण अन् लपवलेले अफेअर्स... पालकांनी सुरू केली 'हाय-टेक' तपासणी

लपवलेले प्रेमसंबंध, कर्ज, नोकरी, शिक्षण आणि व्यसनांची पडताळणी; ऑनलाईन मॅट्रिमोनियल फसवणूक टाळण्यासाठी कुटुंबे

D Y Patil passes away : शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९० व्या वर्षी दुःखाद निधन!

कोल्हापूर : देशातील उच्च शिक्षणाचा चेहरामोहरा बदलणारे थोर शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल आणि 'पद्मश्री' पुरस्कार