आरोग्य सांभाळा, डेंग्यूचा धोका वाढला!

  42

मुंबई: पावसाळ्याच्या दिवसांत साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढली असून राज्यात अनेक ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे या आजाराच्या बचावासाठी आरोग्य प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.


डेंग्यूच्या नियंत्रणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत प्रसिद्धी व जनजागरण मोहीम राबविणे सातत्याने सुरु आहे. आरोग्य विभागातर्फे विविध शासकीय व खाजगी संस्थाना या आजाराच्या खबरदारीबरोबरच संशयित रुग्ण आढळल्यास त्वरित कळविण्याचे पत्र देण्यात आले आहे. तसेच संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीला पाठवून रुग्ण आढळल्यास त्वरित औषधोपचार केले जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.


ताप आल्यास त्वरित जवळच्या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविणे, रक्तजल नमुन्याची तपासणी करून खात्री करणे, आवश्यक ठिकाणी धूर फवारणी, डास उत्पत्ती स्थाने नष्ट करणे, पाण्याची डबकी बुजविणे, साचलेल्या पाण्यात डास अळी भक्षक गप्पी मासे सोडणे, निरुपयोगी टायर, मोकळे डबे, नारळाच्या करवंटी, पाण्याच्या बाटल्यांची विल्हेवाट लावणे, एडीस डास दिवसा चावत असल्याने लहान मुलांना मच्छरदाणीत झोपविणे हे उपाय करणे गरजेचे आहे.



ही आहेत लक्षणे


एकाएकी तीव्र ताप व डोकेदुखी, स्नायू व सांधेदुखी, उलट्या होणे, तीव्र डोळेदुखी, अशक्तपणा येणे, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, ताप कमी जास्त होण, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली व नाकातून रक्तस्त्राव होणे, रक्ताची उलटी होणे, रक्त मिश्रित किंवा काळसर रंगाची सौचास होणे, पोट दुखण्यासारखी लक्षणे डेंग्यु झालेल्या रुग्णामध्ये आढळून येतात.

Comments
Add Comment

आता वेळेत पूर्ण होणार मुंबई मेट्रोची कामे

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पांचा विस्तार झपाट्याने सुरू आहे. एमएमआरडीए हणजेच मुंबई महानगर

गोठवलेल्या बँक खात्यांतील पैसे खातेदारांना लवकर मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) : सायबर गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित करण्यात

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदार यादी वापरण्याचे नियोजन

मुंबई  : मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून स्थानिक

Power Cut: कल्याण-डोंबिवली, अंबरनाथमध्ये अनिच्छित काळासाठी वीजपुरवठा खंडित! महावितरणकडून महत्त्वाची अपडेट

भिवंडी-पडघा येथील 220 केवी सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड कल्याण: कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ या उपनगरांमधील

Jansurksha Bill : महाराष्ट्राला 'जनसुरक्षा कवच'

'शहरी नक्षलवादा'ला लगाम बसणार, १३ हजार सूचनांनी विधेयक तयार! जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर, तेरा हजार सूचनांनी

Varun Sardesai Nilam Gorhe: जराश्या धक्क्याने वरूण सरदेसाईंचा अकांडतांडव, नीलम गोऱ्हेंनी झापलं

मुंबई: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सरकार आणि विरोधक या दोघांमध्ये