पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?


पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष लक्ष्य!


पुणे : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा आपल्या सडेतोड शैलीत, पण यावेळी नावघेता पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे. पुण्यातील एका हिंदुत्ववादी मोर्चादरम्यान बोलताना पडळकरांनी एका 'कॉकटेल कुटुंबा'चा उल्लेख करत, अप्रत्यक्षपणे पवारांना लक्ष्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे.



सांगलीतील 'ऋतुजा पाटील' प्रकरणावरून टीकास्त्र


सांगलीतील ऋतुजा पाटील हत्येप्रकरणी पुण्यात काढण्यात आलेल्या मोर्चात पडळकर बोलत होते. ते म्हणाले, "हिंदू प्रथा-परंपरा पाळणाऱ्या मुलीचं धर्मांतर केलेल्या घरात लग्न लावून देणं ही फसवणूक आहे. अशा पाद्रींना मारायला हवं. सांगलीतील विवाहितेची ही आत्महत्या नसून, कुटुंबियांनी केलेली हत्या आहे."



पडळकर यांनी पुढे आरोप केला की, "हे कुटुंब त्या मुलीला ती हिंदू परंपरा पाळत असल्याने, तिच्या व्रतांच्या आणि उपवासांच्या दिवशी मुद्दाम घरात मांसाहार करत होते. तिचा मानसिक छळ करत होते. ती हिंदू असल्याने गरोदर असलेल्या या मुलीचं डोहाळे जेवण करायचे होते, पण ख्रिश्चन कुटुंबाने तिला त्यांचे संस्कार पाळायला भाग पाडले."



"ते कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे!"


या प्रकरणात आपण आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर, एका समाजाने आंदोलन केलं. त्यात एका गटातील एक कुटुंब पुढे होतं, असं पडळकर म्हणाले. "ते घर देखील एकादशीच्या दिवशी मटण खातं. मटण खाऊन दगडूशेट गणपतीला जातात. ते घरं तुम्हाला माहिती आहे. कारण त्या कुटुंबामध्ये देखील सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, वडील मराठा आणि आई दुसरीच अशी स्थिती आहे. असं ते 'कॉकटेल' घर आहे. ते आता माझी आमदारकी जावी अशी मागणी करत आहेत," असं म्हणत पडळकरांनी पवारांचं नावघेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला.


पडळकरांच्या या टिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी उल्लेख केलेल्या 'कॉकटेल कुटुंबा'चा संबंध थेट कोणत्या कुटुंबाशी आहे, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.


Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार