पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?


पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष लक्ष्य!


पुणे : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा आपल्या सडेतोड शैलीत, पण यावेळी नावघेता पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे. पुण्यातील एका हिंदुत्ववादी मोर्चादरम्यान बोलताना पडळकरांनी एका 'कॉकटेल कुटुंबा'चा उल्लेख करत, अप्रत्यक्षपणे पवारांना लक्ष्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे.



सांगलीतील 'ऋतुजा पाटील' प्रकरणावरून टीकास्त्र


सांगलीतील ऋतुजा पाटील हत्येप्रकरणी पुण्यात काढण्यात आलेल्या मोर्चात पडळकर बोलत होते. ते म्हणाले, "हिंदू प्रथा-परंपरा पाळणाऱ्या मुलीचं धर्मांतर केलेल्या घरात लग्न लावून देणं ही फसवणूक आहे. अशा पाद्रींना मारायला हवं. सांगलीतील विवाहितेची ही आत्महत्या नसून, कुटुंबियांनी केलेली हत्या आहे."



पडळकर यांनी पुढे आरोप केला की, "हे कुटुंब त्या मुलीला ती हिंदू परंपरा पाळत असल्याने, तिच्या व्रतांच्या आणि उपवासांच्या दिवशी मुद्दाम घरात मांसाहार करत होते. तिचा मानसिक छळ करत होते. ती हिंदू असल्याने गरोदर असलेल्या या मुलीचं डोहाळे जेवण करायचे होते, पण ख्रिश्चन कुटुंबाने तिला त्यांचे संस्कार पाळायला भाग पाडले."



"ते कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे!"


या प्रकरणात आपण आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर, एका समाजाने आंदोलन केलं. त्यात एका गटातील एक कुटुंब पुढे होतं, असं पडळकर म्हणाले. "ते घर देखील एकादशीच्या दिवशी मटण खातं. मटण खाऊन दगडूशेट गणपतीला जातात. ते घरं तुम्हाला माहिती आहे. कारण त्या कुटुंबामध्ये देखील सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, वडील मराठा आणि आई दुसरीच अशी स्थिती आहे. असं ते 'कॉकटेल' घर आहे. ते आता माझी आमदारकी जावी अशी मागणी करत आहेत," असं म्हणत पडळकरांनी पवारांचं नावघेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला.


पडळकरांच्या या टिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी उल्लेख केलेल्या 'कॉकटेल कुटुंबा'चा संबंध थेट कोणत्या कुटुंबाशी आहे, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.


Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय