पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

  32


पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष लक्ष्य!


पुणे : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा आपल्या सडेतोड शैलीत, पण यावेळी नावघेता पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे. पुण्यातील एका हिंदुत्ववादी मोर्चादरम्यान बोलताना पडळकरांनी एका 'कॉकटेल कुटुंबा'चा उल्लेख करत, अप्रत्यक्षपणे पवारांना लक्ष्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे.



सांगलीतील 'ऋतुजा पाटील' प्रकरणावरून टीकास्त्र


सांगलीतील ऋतुजा पाटील हत्येप्रकरणी पुण्यात काढण्यात आलेल्या मोर्चात पडळकर बोलत होते. ते म्हणाले, "हिंदू प्रथा-परंपरा पाळणाऱ्या मुलीचं धर्मांतर केलेल्या घरात लग्न लावून देणं ही फसवणूक आहे. अशा पाद्रींना मारायला हवं. सांगलीतील विवाहितेची ही आत्महत्या नसून, कुटुंबियांनी केलेली हत्या आहे."



पडळकर यांनी पुढे आरोप केला की, "हे कुटुंब त्या मुलीला ती हिंदू परंपरा पाळत असल्याने, तिच्या व्रतांच्या आणि उपवासांच्या दिवशी मुद्दाम घरात मांसाहार करत होते. तिचा मानसिक छळ करत होते. ती हिंदू असल्याने गरोदर असलेल्या या मुलीचं डोहाळे जेवण करायचे होते, पण ख्रिश्चन कुटुंबाने तिला त्यांचे संस्कार पाळायला भाग पाडले."



"ते कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे!"


या प्रकरणात आपण आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर, एका समाजाने आंदोलन केलं. त्यात एका गटातील एक कुटुंब पुढे होतं, असं पडळकर म्हणाले. "ते घर देखील एकादशीच्या दिवशी मटण खातं. मटण खाऊन दगडूशेट गणपतीला जातात. ते घरं तुम्हाला माहिती आहे. कारण त्या कुटुंबामध्ये देखील सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, वडील मराठा आणि आई दुसरीच अशी स्थिती आहे. असं ते 'कॉकटेल' घर आहे. ते आता माझी आमदारकी जावी अशी मागणी करत आहेत," असं म्हणत पडळकरांनी पवारांचं नावघेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला.


पडळकरांच्या या टिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी उल्लेख केलेल्या 'कॉकटेल कुटुंबा'चा संबंध थेट कोणत्या कुटुंबाशी आहे, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.


Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी

खिडकीत लटकलेल्या अवस्थेत होती चिमूरडी, शेजारच्यांनी वाचवलं, थरारक Video Viral

पुणे: कात्रज परिसरात एका चार वर्षांच्या चिमूरडीचा जीव थोडक्यात वाचला आहे. ही चिमूरडी खिडकीत धोकादायक अवस्थेत