पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?


पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष लक्ष्य!


पुणे : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा आपल्या सडेतोड शैलीत, पण यावेळी नावघेता पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे. पुण्यातील एका हिंदुत्ववादी मोर्चादरम्यान बोलताना पडळकरांनी एका 'कॉकटेल कुटुंबा'चा उल्लेख करत, अप्रत्यक्षपणे पवारांना लक्ष्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे.



सांगलीतील 'ऋतुजा पाटील' प्रकरणावरून टीकास्त्र


सांगलीतील ऋतुजा पाटील हत्येप्रकरणी पुण्यात काढण्यात आलेल्या मोर्चात पडळकर बोलत होते. ते म्हणाले, "हिंदू प्रथा-परंपरा पाळणाऱ्या मुलीचं धर्मांतर केलेल्या घरात लग्न लावून देणं ही फसवणूक आहे. अशा पाद्रींना मारायला हवं. सांगलीतील विवाहितेची ही आत्महत्या नसून, कुटुंबियांनी केलेली हत्या आहे."



पडळकर यांनी पुढे आरोप केला की, "हे कुटुंब त्या मुलीला ती हिंदू परंपरा पाळत असल्याने, तिच्या व्रतांच्या आणि उपवासांच्या दिवशी मुद्दाम घरात मांसाहार करत होते. तिचा मानसिक छळ करत होते. ती हिंदू असल्याने गरोदर असलेल्या या मुलीचं डोहाळे जेवण करायचे होते, पण ख्रिश्चन कुटुंबाने तिला त्यांचे संस्कार पाळायला भाग पाडले."



"ते कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे!"


या प्रकरणात आपण आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर, एका समाजाने आंदोलन केलं. त्यात एका गटातील एक कुटुंब पुढे होतं, असं पडळकर म्हणाले. "ते घर देखील एकादशीच्या दिवशी मटण खातं. मटण खाऊन दगडूशेट गणपतीला जातात. ते घरं तुम्हाला माहिती आहे. कारण त्या कुटुंबामध्ये देखील सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, वडील मराठा आणि आई दुसरीच अशी स्थिती आहे. असं ते 'कॉकटेल' घर आहे. ते आता माझी आमदारकी जावी अशी मागणी करत आहेत," असं म्हणत पडळकरांनी पवारांचं नावघेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला.


पडळकरांच्या या टिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी उल्लेख केलेल्या 'कॉकटेल कुटुंबा'चा संबंध थेट कोणत्या कुटुंबाशी आहे, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.


Comments
Add Comment

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह