निकृष्ट डाळ बघून शिवसेना आमदाराने केली वेटरची धुलाई

मुंबई : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक मुंबई बाहेरचे आमदार आकाशवाणी आमदार निवासामध्ये वास्तव्यास आहेत. याच आमदार निवासात मंगळवारी रात्री हाणामारी झाली. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आमदारा निवासाच्या कँटिनमधून जेवण मागवले होते. या जेवणात निकृष्ट दर्जाच्या डाळीचा वापर करण्यात आल्याचे बघून आमदार संजय गायकवाड संतापले. त्यांनी निकृष्ट डाळीबाबतचा राग कँटिनच्या वेटरवर काढला. आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनच्या वेटरला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आमदार संजय गायकवाड यांच्या कृतीबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. निकृष्ट अन्न देऊन कँटिन प्रशासन आमदारांच्या जिवाशी खेळत आहे. याचाच राग आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केल्याचे मत काहींनी व्यक्त केले. तर आमदाराने वेटरला मारझोड करणे चुकीचे आहे, असे मत काहींनी व्यक्त केले. यामुळे बुधवार ९ जुलै रोजी अधिवेशनात या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Good Hair : केस गळतायत? मग आहारात नक्की समाविष्ट करा 'हे' ८ पदार्थ; केस होतील मजबूत आणि दाट

मुंबई : बदलती जीवनशैली, ताणतणाव, प्रदूषण आणि अयोग्य आहार यामुळे केस गळणे, केस पातळ होणे आणि अकाली पांढरे होणे या

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

Crime News : सिंगापूरमध्ये बनावट हिऱ्याच्या मदतीने 2 लाख डॉलरच्या हिऱ्याची चोरी; दोन भारतीयांना अटक

नवी दिल्ली : सिंगापूरच्या चायनाटाउनमधील एका दागिन्यांच्या दुकानातून सुमारे 2 लाख सिंगापूर डॉलर (1.54 लाख अमेरिकी

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Uniform Civil Code : मध्यप्रदेश विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक मंजूर

भोपाळ : मध्यप्रदेश विधानसभेत मोठ्या गदारोळात समान नागरी संहिता (ucc) विधेयक मंजूर करण्यात आले. उत्तराखंड, गुजरात

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक