मीरा-भाईंदरमध्ये मनसेचा मोर्चा होणार की नाही ?

मीरा-भाईंदर : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. पण चर्चा सुरू आहे ती मीरा - भाईंदरमधील कायदा आणि सुव्यवस्थेची. ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर येथे व्यवस्थित मराठी बोलू न शकणाऱ्या काही व्यापाऱ्यांना मारहाण झाली. या घटनेचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांना मोर्चा काढला. नंतर मनसेने मीरा-भाईंदर शहरात मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढण्याची घोषणा केली. पण या मोर्चासाठी गर्दीच्या भागातील मार्गाची मागणी केली. गर्दीच्या वेळेत मोर्चा काढण्यासाठी परवानगी दिली तर नागरिकांची गैरसोय होईल त्यामुळे दुसरा एखादा मार्ग सांगा अशी तोंडी विनंती पोलिसांनी केली. पण मनसेचे पदाधिकारी मोर्चा मार्गावर अडून बसले.अखेर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. पोलिसांचा निर्णय आला आणि मीरा भाईंदरमध्ये तणाव वाढण्यास सुरुवात झाली. यामुळे मीरा-भाईंदरमध्ये मनसेचा मोर्चा होणार की नाही ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

पोलिसांनी मागील काही तासांत मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची धरपकड केली आहे. यात मनसेचा जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचाही समावेश आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मनसेच्या अनेक नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. मीरा भाईंदर तसेच वसई विरारमध्ये मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. मनसेच्या राजू पाटील आणि संदीप देशपांडे यांना मीरा-भाईंदर परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि त्यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या व्यतिरिक्त पोलिसांनी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनाही नोटीस बजावली आहे.

भाषिक वाद, नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेस धोका, तसेच तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवत पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. गोपनीय माहितीआधारे ही कारवाई होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मोर्चाबाबत मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

मनसेच्या नेत्यांनी स्थानिक पोलिसांशी चर्चा करुन नागरिकांची कमीत कमी गैरसोय होईल असा मार्ग मोर्चा काढण्यासाठी निवडावा. जर तोडगा निघाला तर मोर्चासाठी लगेच परवानगी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये एवढी खबरदारी घेणे आवश्यक आहे. पोलिसांनी गोपनीय माहितीआधारे कारवाई केली आहे; अस मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मनसेने गर्दीच्या भागातून मोर्चाची परवानगी मागितली. नागरिकांच्या गैरसोयीचा प्राधान्याने विचार करुन पोलिसांनी मोर्चा गर्दीच्या भागातून काढण्यास परवानगी नाकारली आहे. यामुळे मोर्चा आयोजकांनी दुसरा कमी गर्दीचा मार्ग सांगावा. मोर्चाला परवानगी दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Comments
Add Comment

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

इराणशी लढण्याआधी अमेरिकेच्या सैनिकांमध्ये भर समुद्रात टॉयलेटवरून मारामारी

वाशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. अमेरिकेने आपल्या युद्धनौका

President Draupadi Murmu: राष्ट्रपती २५ फेब्रुवारी रोजी करणार राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन

अकोला :  भारत सरकारचे आयुष मंत्रालय, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ ते २८

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील