खाजगी, अनधिकृत शालेय वाहतूक टाळा: कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पालकांना आवाहन

ठाणे: पालकांनी आपल्या मुलांना कोणत्याही खासगी किंवा शालेय परवाना नसलेल्या वाहनातून शाळेत पाठवू नये, असे आवाहन कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. ७ जुलै २०२५ रोजी कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर घडलेल्या एका गंभीर अपघातानंतर हे आवाहन करण्यात आले आहे.


या अपघातात अंबरनाथ येथील फातिमा हायस्कूलमधील शिशु वर्गातील तीन विद्यार्थी एका भरधाव व्हॅनमधून (MH05FB4792) मागील दरवाजा उघडल्याने खाली पडून गंभीर जखमी झाले. व्हॅन चालकाने बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडला. याप्रकरणी, अंबरनाथ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यामुळे मोटार वाहन कायदा, १९८८ नुसार व्हॅनवर दंडात्मक कारवाई करत ती जप्त करण्यात आली आहे.


या घटनेच्या पार्श्वभूमीवर, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांनी सर्व पालकांना त्यांच्या पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिकृत आणि शालेय परवाना असलेल्या वाहनांचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Nashik : कोथिंबिरीच्या जुडीला तब्बल २८५ रुपये; पालेभाज्यांचे भाव गगनाला

Nashik : पावसाने ओढ दिल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम पालेभाज्यांच्या दरावर झाला आहे. नाशिक

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.