IND vs ENG: शुभमनची जबरदस्त फटकेबाजी, मोहम्मद-आकाशदीपची कमाल

मुंबई : भारत सध्या ५ सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. लीड्सच्या पहिल्या कसोटीत चांगला खेळ करूनही भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पराभव सहन करावा लागला होता. मात्र दुसऱ्या कसोटीत गिलच्या संघाने दाखवून दिलं की हम भी कुछ कम नही...एजबेस्टनमध्ये गिलच्या नेतृत्वात टीम इंडियानं ऐतिहासिक असा विजय मिळवलाय.


भारताचा स्टार शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियानं इंग्लंडविरुद्ध एजबेस्टन कसोटीत तब्बल ३३६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडला जिंकण्यासाठी ६०८ धावा हव्या होत्या. मात्र इंग्लंडला केवळ दुसऱ्या डावात २७१ धावाच करता आल्या. या ऐतिहासिक विजयासह भारतानं या मालिकेत १-१ अशी बरोबरी गाठलीये.


खरंतर या सामन्यात गिलची धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळाली. या एकट्या पठ्ठ्यानं संपूर्ण कसोटीत चारशेपेक्षा जास्त धावा केल्या. पहिल्या डावात त्यानं अडीचशेहून अधिक धावा केल्या. त्याचप्रमाणे दुसऱ्या डावातही तो चमकला. दुसऱ्या डावात त्यानं १६१ धावा केल्या. त्यामुळे भारताची जी एकूण धावसंख्या झाली त्यातील अर्धी धावसंख्या तर एकट्या गिलनंच केली होती. गिलचं नेतृत्वही या सामन्यात कौतुकास्पद होतं.


लीड्सच्या पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडियावर सगळीकडून टीका झाली होती. मात्र ही टीका गिलने पॉझिटिव्हली घेतली आणि दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा जोर दाखवून दिला. गिलची फलंदाजी या कसोटीत चमकली मात्र भारताच्या गोलंदाजीतही दोन हिरे चमकेल.


विशेष म्हणजे या कसोटीत भारतीय संघ जसप्रीत बुमराहशिवाय उतरला होता. मात्र त्याची कमतरता आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांनी पूर्ण केले. या दोघांनी प्रत्येकी अर्धा डझनहून अधिक विकेट घेत इंग्रजांच्या संघाला खिंडार पाडण्याचं काम केलं. सिराजनं पहिल्या डावात ६ विकेट घेतल्या तर आकाशदीपनं दुसऱ्या डावात ६ विकेट घेतल्या. याआधी आकाशदीपने पहिल्या डावात ४ विकेट मिळवल्या होत्या.


लीड्सच्या कसोटीत ज्या ज्या चुका टीम इंडियानं केल्या त्यात या सामन्यात सुधारणा झालेली दिसली. लीड्सच्या कसोटीत भारताच्या खेळाडूंनी ८ कॅच सोडले होते. त्याच्या तुलनेने एजबेस्टन कसोटीत भारतीय संघानं चांगली फिल्डिंग केली. काही ठिकाणी त्यांनी संधी गमावल्या मात्र या कसोटीत त्यांनी चांगली कामगिरी केली आणि त्याचा सकारात्मक परिणामही पाहायला मिळाला.


आता तुम्ही म्हणाल की या कसोटी विजयाचे विशेष कौतुक ते कशाला...तर तब्बल ५८ वर्षांनी भारतानं बर्मिंगहॅममध्ये विजयाचा दुष्काळ संपवला. भारताने पहिल्यांदा बर्मिंगहॅममध्ये विजय मिळवला आहे. याआधी ८ सामने खेळवले गेले होते. त्यापैकी ७ सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला होता. तर एक सामना अनिर्णीत राहिला होता. भारतीय संघाने या मैदानावर पहिला कसोटी सामना जुलै १९६७ मध्ये खेळला होता. यात भारताला १३२ धावांनी पराभव मिळाला होता.


आता भारताला तिसरा कसोटी सामना लंडनच्या लॉर्ड्सच्या मैदानावर खेळायचा आहे. १० जुलैपासून या सामन्याला सुरूवात होतेय. सलग दुसरा सामना जिंकत टीम इंडिया या मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघही पराभवातून शिकत जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. गिलच्या नेतृत्वातील यंग टीम इंडियाला पुढच्या कसोटीसाठी खूप खूप शुभेच्छा...



Comments
Add Comment

Virat Kohli : विराट कोहलीच्या नवव्यांदा ५०० धावा पूर्ण

धरमशाला : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये विराट कोहली याने तगड्या

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Hardik Pandya : आयपीएल संपण्याआधीच हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करणार ? सोशल मीडियावर चर्चांना उधाण , सत्य काय?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली

RCB VS PBKS : सलग पाच पराभवाने पंजाबसमोर डू ऑर डाय स्थिती ! धर्मशाळेत पंजाब-आरसीबी आमने सामने

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज १७ मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी निर्णायक लढत होणार आहे. हा