आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन


मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून तिसऱ्या क्रमांकावर येणार असून त्याची जबाबदारी येणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरच निर्भय असून त्यात भावी अधिकाऱ्यांचे मोठे योगदान असेल. आपल्या अंगभूत गुणांनी तसेच अभ्यासपूर्ण कृतीतूनच हे ध्येय आपल्याला साध्य करता येईल, असा मूलमंत्र माजी मंत्री व खासदार नारायण राणे यांनी दिला.


युवा उत्थान फाऊंडेशनच्या वतीने सुशासनाचे प्रशासक या यूपीएससी परीक्षेतील गुणवंतांचा गौरव सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी भावी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सर्वप्रथम नारायण राणे व इतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर काही मोजक्या गुणवंतांनी आपल्या खडतर प्रवासाचे अनुभव सांगितले. युवा उत्थान फाऊंडेशन व नरेडकोचे पदाधिकारी अमोल गवळी, प्रशांत शर्मा, अनिता गवळी यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम २०१६ पासून आयोजित केला जातो.


नारायण राणे पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात भारत हा अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर जाणार असून त्यासाठी आपल्या देशाचा जीडीपी कशाप्रकारे वाढवता येईल त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांनी संविधान, कायदे यांचा अभ्यास करून आपल्या देशाचे उत्पन्न कसे वाढवता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यामुळे जनतेलाही त्याचा फायदा पोहोचून आपल्या देशाचे नाव उंचावण्यास त्यामुळे मदत होईल व त्यासाठी सातत्यपूर्ण वाचन, चौफेर नजर आपण आत्मसात करावी. आपले व आपल्या देशाचे नाव मोठे करावे. एक अधिकारीपद म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी नको तर समाजासाठी काहीतरी ते करणारे असावे. तसेच कोणतेही काम भावनेच्या भरात करू नये तर संविधान व कायद्याच्या कसोटीत राहूनच सर्व करावे, असा सल्लाही नारायण राणे यांनी दिला.


आजच ठरवा की जे निर्णय घ्याल ते १४० कोटी जनतेच्या उत्कर्षासाठी असतील. अधिकारी बनला की चाल बदलते, ती बदलू नका. तुमच्यातली माणुसकी कायम ठेवा. पदाचा दुरुपयोग करू नका. पदाचा मान वाढवा, त्यामुळेच तुमचाही मान वाढेल असेही त्यांनी नमूद केले. नैतिकता स्वीकारावी. भविष्यात देश घडेल, त्यात तुमचे मोठे योगदान असेल असे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.


यावेळी व्यासपीठावर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन सुरक्षा व नियोजन विभागाचे महाव्यवस्थापक राजेंद्र उपनवर, यू.पी.एस.सीचे माजी अध्यक्ष डॉ. डी. पी. अगरवाल, राज्य गुप्तचर विभागाचे सहआयुक्त रवींद्र शिसवे, सिप्झ विकासाचे सहआयुक्त मयूर मानकर, राजेश दोषी आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :