हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी


सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर' अशा संतोक्तीची प्रचिती देत असलेला तीर्थक्षेत्र पंढरपुरच्या आषाढी सोहळा रविवारी भक्तिमय वातावरणात व प्रचंड उत्साहात साजरा होत आहे. संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्यामुळे सुमारे १५ लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले असून लाखो वैष्णवांची मांदियाळीने पंढरपूर भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेले आहे, भाविकांच्या दाटीमुळे पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. राज्यभरातून व परराज्यातून आलेल्या वैष्णवामुळे पंढरीत भाविकांचा महासागर उसळला असल्याचे चित्र दिसून येत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांच्या हस्ते रविवारी पहाटे पार पडली.


आषाढी मात्रा ही सर्वांत मोठी यात्रा असते. त्यामुळे या यात्रेनिमित्त शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. मुख्यमंत्री शनिवारी मुंबईहून विमानाने सोलापुरात दाखल झाले व सोलापुरातून हेलिकॉप्टरने ते पंढरपूरकडे रवाना झाले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्या मजल दरमजल करत शनिवारी रात्री पंढरीत दाखल झाल्या आहेत.


संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखीचे वाखरी येथील शेवटचे उभे रिंगण शुक्रवारी दुपारी संपल्यानंतर पालख्या वाखरी मुक्कामी आल्या होत्या. शनिवारी दुपारी पंढरपूरच्या वेशीवर विसावा मंदिर इसबावी येथे दाखल झाल्या.




वारकऱ्यांच्या स्नानासाठी चंद्रभागेत मुबलक पाणी


आषाढी यात्रेकरिता आलेल्या भाविकांनी चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर परिसर, दर्शन राग व उपनगरीय भाग गजवाजला आहे. दर्शनरांगेत तीन लाखांहून अधिक भाविक आहेत. एका मिनिटाला जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळत आहे. दर्शनासाठी जवळपास आठ ते दहा तासांचा कालावधी लागत आहे. चंद्रभागा नदीत मुबलक पाणी सोडण्यात आल्यामुळे भाविकांना स्नान करता येत आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जीवरक्षक दलाच्या स्पीड बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. आठ हजारांहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण पढरपूर यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वत सर्व पालखी सोहळ्याचे स्वा करण्यात आले. शहरावर सीसीटीव्ही कॅगेन्याची करडी नजर आहे. नगरपालिका, जिल्हा प्रशासन, वालुका प्रशासन याच्या वतीने वारीत येणाऱ्या लाखो भाविकांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस