जळगाव बस अपघाताप्रकरणी आमदार जावळे संतापले, PWD अधिकाऱ्यांना दिला दम

जळगाव: भुसावळ रस्त्यावर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. इंदूरहून जळगावकडे जाणारी श्री गणेश लक्झरी खासगी बस आमोदा गावाजवळ एका पुलावरून थेट मोर नदीच्या पात्रात कोसळली. या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, २५ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


या घटनेची माहिती मिळताच रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्त बसची पाहणी करून जखमी प्रवाशांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आणि अपघातांच्या वाढत्या संख्येवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.


आक्रमक झालेले आमदार जावळे
आमदार अमोल जावळे आज चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले. गेल्या महिन्यात याच रस्त्यावर २५ अपघातांच्या घटना घडल्या असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे त्यांनी हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेतला.


त्यांनी सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विश्वानंद तायडे यांना घटनास्थळी बोलावून, या ठिकाणी वारंवार अपघात का होत आहेत, याची सविस्तर माहिती घेतली. रस्त्याच्या रचनेतील तांत्रिक त्रुटी, चुकीचे वळण, साईन बोर्ड आणि रिफ्लेक्टरची कमतरता, तसेच सुरक्षात्मक कठड्यांची आवश्यकता या सर्व बाबींचा त्यांनी आढावा घेतला.


अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा
या पार्श्वभूमीवर आमदार जावळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. "ज्या तांत्रिक कारणांमुळे हे अपघात घडत आहेत, त्यावर पुढील आठ दिवसांत ठोस उपाययोजना करून सुरक्षेची हमी द्यावी. अन्यथा यानंतर काही घटना घडल्यास माझ्यापेक्षा वाईट कोणी राहणार नाही," असा स्पष्ट इशारा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. "तुम्ही काय करतात, काय देता याच्याशी मला घेणेदेणे नाही," असेही त्यांनी सुनावले.

Comments
Add Comment

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी