जळगाव बस अपघाताप्रकरणी आमदार जावळे संतापले, PWD अधिकाऱ्यांना दिला दम

जळगाव: भुसावळ रस्त्यावर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. इंदूरहून जळगावकडे जाणारी श्री गणेश लक्झरी खासगी बस आमोदा गावाजवळ एका पुलावरून थेट मोर नदीच्या पात्रात कोसळली. या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, २५ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


या घटनेची माहिती मिळताच रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्त बसची पाहणी करून जखमी प्रवाशांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आणि अपघातांच्या वाढत्या संख्येवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.


आक्रमक झालेले आमदार जावळे
आमदार अमोल जावळे आज चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले. गेल्या महिन्यात याच रस्त्यावर २५ अपघातांच्या घटना घडल्या असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे त्यांनी हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेतला.


त्यांनी सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विश्वानंद तायडे यांना घटनास्थळी बोलावून, या ठिकाणी वारंवार अपघात का होत आहेत, याची सविस्तर माहिती घेतली. रस्त्याच्या रचनेतील तांत्रिक त्रुटी, चुकीचे वळण, साईन बोर्ड आणि रिफ्लेक्टरची कमतरता, तसेच सुरक्षात्मक कठड्यांची आवश्यकता या सर्व बाबींचा त्यांनी आढावा घेतला.


अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा
या पार्श्वभूमीवर आमदार जावळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. "ज्या तांत्रिक कारणांमुळे हे अपघात घडत आहेत, त्यावर पुढील आठ दिवसांत ठोस उपाययोजना करून सुरक्षेची हमी द्यावी. अन्यथा यानंतर काही घटना घडल्यास माझ्यापेक्षा वाईट कोणी राहणार नाही," असा स्पष्ट इशारा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. "तुम्ही काय करतात, काय देता याच्याशी मला घेणेदेणे नाही," असेही त्यांनी सुनावले.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह