देहरजे नदीवरील पुरात अडकलेल्या मुलाला वाचवण्यात यश

शीळ, देहर्जे गावातील नागरिकांची घटनास्थळी धाव


विक्रमगड : देहर्जे-शीळ गावाला जोडणाऱ्या देहरजे नदीवरील पुल पार करतांना पांडुरंग मेरे रा. हातणे या नागरिकांला पाण्याचा अंदाज न आल्याने व पुलावर गेल्यावर अचानक नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने. हा नागरिक पुराच्या पाण्यात पुलावर अडकला होता. प्रशासनाच्या व नागरिकांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.


पांडुरंग मेरे, रा. हातणे हा आज सकाळी ९.३० च्या सुमारास देहर्जे गावातून शीळकडे जात असताना देहरजे नदीवरील पूल पार करताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच पाण्याच्या पातळी वाढल्याने पुलाच्या मधोमध अडकला होता. या बाबतची माहिती मिळताच विक्रमगड तहसीलदार मयूर चव्हाण व प्रशासन, शीळ, देहर्जे गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.


तत्काळ दोराच्या सहाय्याने या नागरिकांला पाण्याच्या प्रवाहातून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.
सुदैवाने या नागरिकांला कोणतेही गंभीर दुःखापत झाली नसून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. यासाठी शीळ व देहर्जे गावातील नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. पूर परिस्थिती नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील