देहरजे नदीवरील पुरात अडकलेल्या मुलाला वाचवण्यात यश

शीळ, देहर्जे गावातील नागरिकांची घटनास्थळी धाव


विक्रमगड : देहर्जे-शीळ गावाला जोडणाऱ्या देहरजे नदीवरील पुल पार करतांना पांडुरंग मेरे रा. हातणे या नागरिकांला पाण्याचा अंदाज न आल्याने व पुलावर गेल्यावर अचानक नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने. हा नागरिक पुराच्या पाण्यात पुलावर अडकला होता. प्रशासनाच्या व नागरिकांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.


पांडुरंग मेरे, रा. हातणे हा आज सकाळी ९.३० च्या सुमारास देहर्जे गावातून शीळकडे जात असताना देहरजे नदीवरील पूल पार करताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच पाण्याच्या पातळी वाढल्याने पुलाच्या मधोमध अडकला होता. या बाबतची माहिती मिळताच विक्रमगड तहसीलदार मयूर चव्हाण व प्रशासन, शीळ, देहर्जे गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.


तत्काळ दोराच्या सहाय्याने या नागरिकांला पाण्याच्या प्रवाहातून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.
सुदैवाने या नागरिकांला कोणतेही गंभीर दुःखापत झाली नसून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. यासाठी शीळ व देहर्जे गावातील नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. पूर परिस्थिती नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Vasai Fort : 'मला मराठी येत नाही!' म्हणत वसई किल्ल्यावर सुरक्षा रक्षकाचा माज; शिवरायांच्या वेशातील युवकाला फोटो काढण्यास मज्जाव!

पालघर : वसईच्या ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ल्यावर (Vasai Fort) दीपोत्सवाच्या (Deepotsav) शुभदिनी एक अनपेक्षित आणि वादग्रस्त घटना

विरारमधील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग; मोठे आर्थिक नुकसान

विरार: विरार पूर्वेकडील आरजे सिग्नलजवळ असलेल्या एका फर्निचरच्या मोठ्या दुकानाला २१ ऑक्टोबरच्या दुपारी भीषण आग

रिचा पाटीलच्या आत्महत्येची सखोल चौकशी करा

भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट विरार : विरार पश्चिम येथील विवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या १९

ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे भाव घसरले, कांदा उत्पादक हवालदिल

लासलगाव : ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले

वाढवण बंदराविरोधातील स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

 वाढवण बंदराच्या नियोजित विकासाला स्थगिती देण्याची स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने

वसई-विरारमध्ये ऑटोरिक्षा-टॅक्सींसाठी मीटर बंधनकारक

१५ नोव्हेंबरनंतर मीटरशिवाय भाडे घेतल्यास थेट कारवाई. मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय; ठाणे, कल्याणसाठी