Terrorist hideout destroyed: पुंछमध्ये दहशतवादी अड्डा नष्ट, शस्त्रसामुग्री जप्त

  68

सुरनकोट जंगलात लष्कर-पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शस्त्रसाठा सापडला; किश्तवाडमध्ये स्वतंत्र दहशतवादविरोधी मोहीम सुरू


जम्मू:  जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात आज, शनिवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा अड्डा नष्ट केला. पोलिस आणि सैन्याने संयुक्तपणे सुरणकोटच्या जंगलात राबवलेल्या मोहिमेत हा अड्डा आढळून आला.

यासंदर्भातील माहितीनुसार सुरक्षा दलांनी जंगलातील या अड्ड्यातून ३ हातबॉम्ब, एके रायफलच्या १४ गोळ्या, पिस्तूलच्या ६ गोळ्या, वायर कटिंग टूल, एक चाकू, डेटा केबल कनेक्टर, ५ पेन्सिल सेल, एक लोखंडी रॉड आणि एक पेंट बॉक्स जप्त करण्यात आला. या कारवाईत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.



शोध मोहीम अजूनही सुरू


त्याच वेळी, किश्तवार जिल्ह्यातील चतरू जंगलात दहशतवादाविरुद्धची कारवाई चौथ्या दिवशीही सुरू आहे. बुधवारी संध्याकाळी सुरू झालेल्या या कारवाईत, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांशी सामना केला आणि अनेक तास गोळीबार सुरू राहिला. अंधार, घनदाट जंगल आणि कठीण भूभागामुळे दहशतवादी पळून गेले. त्यांच्या शोधासाठी अजूनही शोध मोहीम सुरू आहे.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला