Terrorist hideout destroyed: पुंछमध्ये दहशतवादी अड्डा नष्ट, शस्त्रसामुग्री जप्त

सुरनकोट जंगलात लष्कर-पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शस्त्रसाठा सापडला; किश्तवाडमध्ये स्वतंत्र दहशतवादविरोधी मोहीम सुरू


जम्मू:  जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात आज, शनिवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा अड्डा नष्ट केला. पोलिस आणि सैन्याने संयुक्तपणे सुरणकोटच्या जंगलात राबवलेल्या मोहिमेत हा अड्डा आढळून आला.

यासंदर्भातील माहितीनुसार सुरक्षा दलांनी जंगलातील या अड्ड्यातून ३ हातबॉम्ब, एके रायफलच्या १४ गोळ्या, पिस्तूलच्या ६ गोळ्या, वायर कटिंग टूल, एक चाकू, डेटा केबल कनेक्टर, ५ पेन्सिल सेल, एक लोखंडी रॉड आणि एक पेंट बॉक्स जप्त करण्यात आला. या कारवाईत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.



शोध मोहीम अजूनही सुरू


त्याच वेळी, किश्तवार जिल्ह्यातील चतरू जंगलात दहशतवादाविरुद्धची कारवाई चौथ्या दिवशीही सुरू आहे. बुधवारी संध्याकाळी सुरू झालेल्या या कारवाईत, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांशी सामना केला आणि अनेक तास गोळीबार सुरू राहिला. अंधार, घनदाट जंगल आणि कठीण भूभागामुळे दहशतवादी पळून गेले. त्यांच्या शोधासाठी अजूनही शोध मोहीम सुरू आहे.

Comments
Add Comment

हिवाळी अधिवेशनाआधी केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

मुंबई : हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते