"मी मराठी बोलणार नाही..." व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले, मुख्यमंत्र्यांनी फटकारले

मुंबई: पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला असला तरी मराठीच्या मुद्द्यावरुन चाललेले राजकारण आताही सुरूच आहे . अशातच शेअर बाजारातील व्यावसायिक सुशील केडिया यांनी शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टॅग करीत,  थेट आव्हान देणारे ट्विट केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. यातच उबाठा  आणि मनसेने आज मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. त्यामुळे माय मराठीवरून राज्यात पुन्हा एकदा रणकंदन सुरू आहे.



काय आहे नेमके प्रकरण?


मुंबईजवळील मीरा-भाईंदर शहरात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मारवाडी जैन समाजातील एका दुकानदाराला मराठी न बोलल्याबद्दल मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला असला तरी. परंतु हे प्रकरण गंभीर होत चालले आहे आणि आता ते एक मोठे राजकीय प्रकरण बनले आहे. दरम्यान, प्रसिद्ध गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी मराठीत न बोलण्याची शपथ घेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, "मी मराठी बोलणार नाही आणि मराठी शिकणार नाही." त्यांच्या या ट्विटमुळे राजकारण आणखीन तापण्याची शक्यता आहे. ज्याचा मुद्दा आजच्या उबाठा आणि मनसे प्रमुखांच्या मेळाव्यात उपस्थित केलं जाऊ शकतो.



देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


ठाकरे बंधुच्या  विजयी मेळाव्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, त्यांनी जरूर मेळावा घ्यावा, आम्ही घेतलेल्या निर्णयांचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतोय. पण हिंदी सक्तीसाठी समिती करणारे, त्या समितीत आपल्या उपनेत्याला टाकणारे, पहिलीपासून बारावीपर्यंत हिंदी सक्तीचा करा ही त्या समितीची शिफारस स्वीकारणारे आता मेळावा घेणार आहेत. कोण दुटप्पी आहे हे मराठी माणसाला लक्षात येते", अशी टीका फडणवीस यांनी केली.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी केडिया यांनाही फटकारले. मी मराठी शिकणार नाही हे अत्यंत उद्दामपणे सांगणे चुकीचे नाही का? असा सवाल त्यांनी केला.

Comments
Add Comment

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी

अमली पदार्थ विक्रेत्यांची संपत्ती जप्त करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कुरिअर कंपन्यांवर बारीक नजर

मुंबई : "युवा पिढीसमोर अंमली पदार्थांचे मोठे आव्हान आहे. या प्रश्नाबाबत राज्य सरकारची भूमिका अत्यंत कठोर आहे.

विधिमंडळाच्या गतिमान (?) कारभाराविषयी मुनगंटीवारांनी सांगितला भन्नाट किस्सा

फडणवीसांनी आमदार असताना मांडलेल्या कपात सूचनेचे उत्तर मिळाले उपमुख्यमंत्री झाल्यानंतर - विधिमंडळ कामकाजातील

"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य पुतळ्याची उभारणी व समृद्धी महामार्गावरील सुविधांबाबत आठ दिवसांत सभागृहाला अवगत करावे ; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना"

जनतेच्या तक्रारींची दखल घ्या; फूड जॉईंट्सची प्रत्यक्ष नोंद दाखवा- डॉ. गोऱ्हे "कागदोपत्री माहितीपेक्षा