"मी मराठी बोलणार नाही..." व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले, मुख्यमंत्र्यांनी फटकारले

मुंबई: पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला असला तरी मराठीच्या मुद्द्यावरुन चाललेले राजकारण आताही सुरूच आहे . अशातच शेअर बाजारातील व्यावसायिक सुशील केडिया यांनी शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टॅग करीत,  थेट आव्हान देणारे ट्विट केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. यातच उबाठा  आणि मनसेने आज मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. त्यामुळे माय मराठीवरून राज्यात पुन्हा एकदा रणकंदन सुरू आहे.



काय आहे नेमके प्रकरण?


मुंबईजवळील मीरा-भाईंदर शहरात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मारवाडी जैन समाजातील एका दुकानदाराला मराठी न बोलल्याबद्दल मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला असला तरी. परंतु हे प्रकरण गंभीर होत चालले आहे आणि आता ते एक मोठे राजकीय प्रकरण बनले आहे. दरम्यान, प्रसिद्ध गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी मराठीत न बोलण्याची शपथ घेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, "मी मराठी बोलणार नाही आणि मराठी शिकणार नाही." त्यांच्या या ट्विटमुळे राजकारण आणखीन तापण्याची शक्यता आहे. ज्याचा मुद्दा आजच्या उबाठा आणि मनसे प्रमुखांच्या मेळाव्यात उपस्थित केलं जाऊ शकतो.



देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


ठाकरे बंधुच्या  विजयी मेळाव्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, त्यांनी जरूर मेळावा घ्यावा, आम्ही घेतलेल्या निर्णयांचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतोय. पण हिंदी सक्तीसाठी समिती करणारे, त्या समितीत आपल्या उपनेत्याला टाकणारे, पहिलीपासून बारावीपर्यंत हिंदी सक्तीचा करा ही त्या समितीची शिफारस स्वीकारणारे आता मेळावा घेणार आहेत. कोण दुटप्पी आहे हे मराठी माणसाला लक्षात येते", अशी टीका फडणवीस यांनी केली.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी केडिया यांनाही फटकारले. मी मराठी शिकणार नाही हे अत्यंत उद्दामपणे सांगणे चुकीचे नाही का? असा सवाल त्यांनी केला.

Comments
Add Comment

धर्मांतर विरोधी विधेयकात घुमला २००४ चा आवाज, डॉ. नीलम गोऱ्हेंनी सभागृहात जागवल्या जुन्या आठवणी

मुंबई: महाराष्ट्रात प्रलोभन किंवा बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या समस्येला आळा घालण्यासाठी आज विधान परिषदेत

धर्मस्वातंत्र्य कायद्यामुळे आमिष, बळजबरी करणाऱ्यांचे कंबरडे मोडणार!

मुंबई : राज्यातील १४ कोटी जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकारांना आळा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; देशस्थिती, महाराष्ट्रातील प्रश्नांवर सखोल चर्चा

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी

थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा; सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या कर्जाला मिळणार माफी!

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे विधान परिषदेत आश्वासन मुंबई : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज

छत्रपती शिवरायांच्या अपमानावर संजय राऊत गप्प का ?

मुंबई : धर्मांध आक्रमकांचा उदोउदो करण्याची सवय जडलेल्या आणि मुस्लीमांचे तुष्टीकरण करणा-या संजय राऊतांनी

जितेंद्र आव्हाडांचे शिवरायांविषयीचे विधान जाणीवपूर्वक - मंत्री शंभूराज देसाई

- जितेंद्र आव्हाडांना कठोर किंमत मोजावी लागेल मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड