"मी मराठी बोलणार नाही..." व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले, मुख्यमंत्र्यांनी फटकारले

  57

मुंबई: पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला असला तरी मराठीच्या मुद्द्यावरुन चाललेले राजकारण आताही सुरूच आहे . अशातच शेअर बाजारातील व्यावसायिक सुशील केडिया यांनी शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टॅग करीत,  थेट आव्हान देणारे ट्विट केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. यातच उबाठा  आणि मनसेने आज मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. त्यामुळे माय मराठीवरून राज्यात पुन्हा एकदा रणकंदन सुरू आहे.



काय आहे नेमके प्रकरण?


मुंबईजवळील मीरा-भाईंदर शहरात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मारवाडी जैन समाजातील एका दुकानदाराला मराठी न बोलल्याबद्दल मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला असला तरी. परंतु हे प्रकरण गंभीर होत चालले आहे आणि आता ते एक मोठे राजकीय प्रकरण बनले आहे. दरम्यान, प्रसिद्ध गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी मराठीत न बोलण्याची शपथ घेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, "मी मराठी बोलणार नाही आणि मराठी शिकणार नाही." त्यांच्या या ट्विटमुळे राजकारण आणखीन तापण्याची शक्यता आहे. ज्याचा मुद्दा आजच्या उबाठा आणि मनसे प्रमुखांच्या मेळाव्यात उपस्थित केलं जाऊ शकतो.



देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


ठाकरे बंधुच्या  विजयी मेळाव्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, त्यांनी जरूर मेळावा घ्यावा, आम्ही घेतलेल्या निर्णयांचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतोय. पण हिंदी सक्तीसाठी समिती करणारे, त्या समितीत आपल्या उपनेत्याला टाकणारे, पहिलीपासून बारावीपर्यंत हिंदी सक्तीचा करा ही त्या समितीची शिफारस स्वीकारणारे आता मेळावा घेणार आहेत. कोण दुटप्पी आहे हे मराठी माणसाला लक्षात येते", अशी टीका फडणवीस यांनी केली.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी केडिया यांनाही फटकारले. मी मराठी शिकणार नाही हे अत्यंत उद्दामपणे सांगणे चुकीचे नाही का? असा सवाल त्यांनी केला.

Comments
Add Comment

'हिंदूंना बदनाम करण्याचा काही राजकारण्यांचा कट'

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या निवडक नेत्यांनी हिंदूंना बदनाम

मतदार यादीतून माझे नाव गायब होऊ शकते तर..., तेजस्वी यादवच्या या आरोपावर निवडणूक आयोगाचे आले स्पष्टीकरण

पाटणा : बिहारच्या मतदार यादीतून तेजस्वी यादव यांचे नाव वगळण्यात आलेले नाही. पाटणा जिल्हा प्रशासनाने तेजस्वी

शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, 'या' मुद्यावर झाली सविस्तर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी राज्याचे

यवतमाळमध्ये उबाठाला खिंडार, शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ सुरुच

ठाणे : शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ सुरुच असून यवतमाळमधील नेर नगपालिकेच्या तीन माजी नगराध्यक्षांसह पाच

Malegaon bomb blast case: जर कोणी दोषी नसेल, तर सहा जणांना कोणी मारलं?: ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल!

मुंबई: २००८ मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे

काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आता भाजपवासी

मुंबई : जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि तीन टर्मचे आमदार आणि सध्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी