Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी गिळण्याचा प्रयत्न केला. ही माहिती सर्पमित्राला मिळताच त्यांच्या अथक प्रयत्नाने अजगराचे प्राण वाचले. मात्र बकरीला यात जीव गमवावा लागला. तालुक्यातील सुरवाडी येथील शेत शिवारात एका १३ फूट अजगराने बकरीला शिकार बनवण्याचा प्रयत्न केला.



सुरवाडी खुर्द शेत शिवारात परिसरातील भूषण भोंबे यांच्या बकऱ्या नेहमीप्रमाणे आजही चरण्यासाठी गेल्या होत्या. त्याच भागात भला मोठा अजगर दडून बसला होता. अजगराने बकरीवर झडप घालून तिला गिळण्यासाठी विळखा घातला. विळखा मारल्याने अजगराला कमालीचा त्रास होत होता. ही बाब काही लोकांच्या निदर्शनास येताच त्यांनी ही माहिती सर्पमित्र अविनाश पांडे यांना दिली. पांडे यांनी अजगराच्या तावडीतून त्या बकरीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु, बकरीचा यात जीव वाचला नाही. मात्र, अजगराचे प्राण वाचवण्यात ते यशस्वी झाले. सर्पमित्र अविनाश पांडे यांनी अजगराला सुरक्षितपणे पकडल्यानंतर वन विभागात नोंद करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन