पराभवाची चाहूल लागताच संतापला इंग्रज, DRS वरुन पंचांवर भडकला बेन स्टोक्स

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभवाची चाहूल लागली आहे. यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंची चिडचिड सुरू झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज बेन स्टोक्स याने DRS चे निमित्त करुन मैदानातील पंचांवर राग काढला.

पाच कसोटी सामन्यांची मालिका

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची इंग्लंडमध्ये सुरू आहे. इंग्लंडने हेडिंग्ले, लीड्स येथे झालेली पहिली कसोटी पाच गडी राखून जिंकली. आता दुसरी कसोटी एजबॅस्टन बर्मिंगहॅम येथे सुरू आहे. या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारत २४४ धावांनी आघाडीवर आहे. बर्मिंगहॅमच्या कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या डावात सर्वबाद ५८७ धावा केल्या. इंग्लंडने त्यांच्या पहिल्या डावात सर्वबाद ४०७ धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एक बाद ६४ धावा केल्या. यामुळे बर्मिंगहॅमच्या कसोटीत भारताचे पारडे जड दिसत आहे.

पंचांवर भडकला बेन स्टोक्स

भारताच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी छान सुरुवात केली. पण यशस्वी जयस्वाल २८ धावा करुन बाद झाला. याआधी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल ही जोडी लवकर फुटत नसल्याचे बघून बेन स्टोक्स अस्वस्थ झाला होता. भारताच्या दुसऱ्या डावात आठव्या षटकात जोश टोंगचा चेंडू यशस्वी जयस्वालच्या पॅडला लागला. इंग्लंडच्या खेळाडूंनी अपील केले. पंच शरफुद्दौला यांनी अपील स्वीकारत यशस्वी जयस्वाल बाद असल्याचा निर्णय दिला. हा निर्णय येताच यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी आपापसात चर्चा केली. नंतर यशस्वी जयस्वालने रिव्ह्यू मागितला. पंचांनी रिव्ह्यू मागायची परवानगी दिली. पण रिव्ह्यू मागण्यासाठी असलेला उपलब्ध असलेला १५ सेकंदांचा कालावधी संपला असल्याचे सांगत बेन स्टोक्सने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तो पंचांवर भडकला. इंग्लंडच्या प्रेक्षकांनी पंचांविरोधात बोंबाबोंब सुरू केली. पण रिव्ह्यूला परवानगी मिळाली होती म्हणून तिसऱ्या पंचांनी वेगवेगळ्या कॅमेऱ्यांच्या मदतीने नेमके काय घडले ते तपासले. अखेर तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला. यानंतर बेन स्टोक्सचा दावा खरा होता का याचीही तपासणी झाली, त्यात स्टोक्सच्या दाव्यात तथ्य आढळले. अखेर बाद झालेला यशस्वी जयस्वाल मैदानाबाहेर गेला. नंतर केएल राहुल आणि करुण नायर यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत आणखी पडझड होणार नाही याची खबरदारी घेतली.
Comments
Add Comment

IND vs AUS : सेमीफायनलवर पावसाचं सावट, सामना रद्द झाल्यास काय होणार?

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक आता अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन