पराभवाची चाहूल लागताच संतापला इंग्रज, DRS वरुन पंचांवर भडकला बेन स्टोक्स

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभवाची चाहूल लागली आहे. यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंची चिडचिड सुरू झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज बेन स्टोक्स याने DRS चे निमित्त करुन मैदानातील पंचांवर राग काढला.

पाच कसोटी सामन्यांची मालिका

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची इंग्लंडमध्ये सुरू आहे. इंग्लंडने हेडिंग्ले, लीड्स येथे झालेली पहिली कसोटी पाच गडी राखून जिंकली. आता दुसरी कसोटी एजबॅस्टन बर्मिंगहॅम येथे सुरू आहे. या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारत २४४ धावांनी आघाडीवर आहे. बर्मिंगहॅमच्या कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या डावात सर्वबाद ५८७ धावा केल्या. इंग्लंडने त्यांच्या पहिल्या डावात सर्वबाद ४०७ धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एक बाद ६४ धावा केल्या. यामुळे बर्मिंगहॅमच्या कसोटीत भारताचे पारडे जड दिसत आहे.

पंचांवर भडकला बेन स्टोक्स

भारताच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी छान सुरुवात केली. पण यशस्वी जयस्वाल २८ धावा करुन बाद झाला. याआधी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल ही जोडी लवकर फुटत नसल्याचे बघून बेन स्टोक्स अस्वस्थ झाला होता. भारताच्या दुसऱ्या डावात आठव्या षटकात जोश टोंगचा चेंडू यशस्वी जयस्वालच्या पॅडला लागला. इंग्लंडच्या खेळाडूंनी अपील केले. पंच शरफुद्दौला यांनी अपील स्वीकारत यशस्वी जयस्वाल बाद असल्याचा निर्णय दिला. हा निर्णय येताच यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी आपापसात चर्चा केली. नंतर यशस्वी जयस्वालने रिव्ह्यू मागितला. पंचांनी रिव्ह्यू मागायची परवानगी दिली. पण रिव्ह्यू मागण्यासाठी असलेला उपलब्ध असलेला १५ सेकंदांचा कालावधी संपला असल्याचे सांगत बेन स्टोक्सने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तो पंचांवर भडकला. इंग्लंडच्या प्रेक्षकांनी पंचांविरोधात बोंबाबोंब सुरू केली. पण रिव्ह्यूला परवानगी मिळाली होती म्हणून तिसऱ्या पंचांनी वेगवेगळ्या कॅमेऱ्यांच्या मदतीने नेमके काय घडले ते तपासले. अखेर तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला. यानंतर बेन स्टोक्सचा दावा खरा होता का याचीही तपासणी झाली, त्यात स्टोक्सच्या दाव्यात तथ्य आढळले. अखेर बाद झालेला यशस्वी जयस्वाल मैदानाबाहेर गेला. नंतर केएल राहुल आणि करुण नायर यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत आणखी पडझड होणार नाही याची खबरदारी घेतली.
Comments
Add Comment

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर